AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EXPLAINER : दोन निवडणुकांमध्ये फ्लॉप, तरीही भाजपच्या निशाण्यावर राहुल गांधीच का?

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपासून काँग्रेसकडून राहुल गांधी यांची चाचपणी होत आहे. 2024 च्या निवडणुकीतही काँग्रेसच्या फ्रंटफूटवर राहुल गांधीच आहेत. दोन निवडणुकांमध्ये अपयशी ठरूनही राहुल गांधी हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ते भाजप नेत्यांचे सर्वांचेच लक्ष्य ठरले आहेत? काँग्रेसला संपवण्याची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा राहुल गांधी यांचेच नाव वारंवार समोर का येते?

EXPLAINER : दोन निवडणुकांमध्ये फ्लॉप, तरीही भाजपच्या निशाण्यावर राहुल गांधीच का?
rahul gandhi and narendra modiImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: May 26, 2024 | 7:22 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या 2014 आणि 2019 च्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने पंतप्रधान चेहरा म्हणून राहुल गांधी यांना आजमावले. पण, राहुल गांधी दोन्ही वेळा फ्लॉप ठरले. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला पहिल्यांदाच दुहेरी आकड्यांचा फटका बसला. राहुल यांच्या नेतृत्वाखाली लढलेली काँग्रेसची ती पहिलीच निवडणूक होती. त्या निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी किंवा आई सोनिया गांधी यांच्या काळातही अशी परिस्थिती कॉंग्रेसवर अशी कधीही आली नव्हती. 2019 मध्येही राहुल गांधी यांना स्वतःला सिद्ध करता आले नाही. त्या निवडणुकीतही कॉंग्रेसला 52 जागा मिळाल्या. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान म्हणून काँग्रेसने त्यांच्या नावाची घोषणा केली नाही. पण, विरोधी पक्षांच्या ‘इंडिया आघाडी’ने काँग्रेसला चांगल्या स्थितीची संधी दिली तर राहुल गांधी हेच नेतृत्व करतील हे आतापर्यंत न उघडलेले सत्य आहे.

कॉंग्रेसमधील नकारात्मक समज असलेला गट

2004 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला यश मिळाले. त्यावेळी पक्षाची कमान सोनिया गांधी यांच्याकडे होती. नेहरू-गांधी घराण्यासोबत एकनिष्ठ नेत्यांना सोनिया गांधी यांनीच पंतप्रधान व्हावे असे वाटत होते. मात्र, त्यांच्या परदेशी मुद्दा पुढे आला. त्यांनी जितक्या नम्रपणे पंतप्रधान होण्यास नकार दिला तितक्याच अधीरतेने राहुल गांधी पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहू लागले. काँग्रेस नेहमीच नेहरू, गांधी घराण्याला समर्पित असल्याने त्यांची मनधरणी करून पद गमावण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. त्याचवेळी चांगला पर्याय नसल्याने नरेंद्र मोदी यांचा चेहरा पाहून कॉंग्रेसमधील नकारात्मक समज असलेला गट भाजपकडे वळला. तो वर्ग आता मोदींना पूर्वीपेक्षा जास्त पसंत करू लागला आहे.

मुस्लिम तुष्टीकरणामुळे…

2014 मध्ये पहिल्यांदाच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेल्या किमान उमेदवारांची संख्याही जिंकता आली नाही, हे राहुल गांधी यांचे कर्तृत्व होते. काँग्रेसच्या 125 वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात लाजिरवाणा पराभव होता. पराभवाची कारणे शोधण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली. ए. के. अँटनी हे त्याचे अध्यक्ष होते. त्या समितीला नेतृत्वात कोणतीही कमतरता आढळली नाही. मात्र, काँग्रेसच्या अल्पसंख्याकांच्या वेडामुळे ही स्थिती झाली, असे एक कारण देण्यात आले. याचा अर्थ मुस्लिम तुष्टीकरणामुळे काँग्रेसचे समर्थक हिंदू भाजपकडे गेले. पण, त्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी न करता काँग्रेसचे अल्पसंख्याकांबद्दलचे प्रेम आणखी जागृत झाले. त्याचे परिणाम काय होतील हे कुणाला सांगायची गरज नाही.

भाजपला भीती कशाची वाटते?

भाजपने आधीपासूनच काँग्रेसशी सामना करण्याची तयारी केली होती. त्यात राहुल गांधी हेच सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सर्वात मोठे लक्ष्य ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अमित शहांपर्यंत अनेकदा काँग्रेसला संपवण्याची चर्चा करत होते. मात्र, जेव्हा जेव्हा अशी चर्चा होते त्या त्यावेळी राहुल गांधी यांचे नाव वारंवार समोर येते. प्रश्न एवढाच आहे की राहुल गांधी याआधी दोनदा नाकारले गेले. काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली. तरीही इंदिरा, नेहरू यांच्यानंतरच राहुल यांचेच नाव भाजपचे नेते का घेत आहेत? राहुल आणि त्यांच्या पूर्वजांची अशी कोणती ताकद आहे ज्याची भाजपला भीती वाटते? राहुल गांधी यांची खरोखरच अशी स्थिती आहे का की पंतप्रधान मोदी किंवा सत्ताधारी पक्षाचे सर्व नेते राहुल यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांची चर्चा अपूर्ण मानतात?

मात्र, गेल्या वर्षी खुद्द राहुल गांधींना याचा फटका सहन करावा लागला, तेव्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांचे सदस्यत्व काढून घेण्यात आले. मात्र, हा अध्यादेश फाडून फेकल्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एका वर्गाने राहुलचे कौतुक केले तर दुसऱ्या वर्गाने राहुल यांच्याकडे गांभीर्याचा अभाव असल्याचे मानले. मनमोहनसिंग यांच्या प्रतिष्ठेची त्यांनी काळजी घ्यायला हवी होती, असा युक्तिवाद त्यांना बेफिकीर मानणारे करत होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनीही पंतप्रधान म्हणून आपल्या सौम्यतेने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले होते.

स्वातंत्र्यापासून आजतागायत राहुल गांधी यांच्या पूर्वजांचे काही कार्य उल्लेखनीय असण्याची शक्यता आहे. आजही असे अनेक लोक आहेत की ज्यांना वाटते राहुल यांच्या कुटुंबाने स्वातंत्र्यानंतर दोन हौतात्म्य दिले. याबद्दलची सहानुभूती असणे स्वाभाविक आहे. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळातील परिस्थिती निराळी होती. पण, इंदिरा गांधी यांची काही उल्लेखनीय कामे लोकांना आठवतात. बँकांचे राष्ट्रीयीकरण, कोळसा उद्योगाचे सरकारीकरण आणि 1971 च्या बांगलादेशातील त्यांच्या सरकारची भूमिका हे कागदोपत्री पुरावे आहेत. त्याउलट मुस्लीम तुष्टीकरण, प्रादेशिक पक्षांच्या शैलीत राहुल गांधी यांनी मागास लोकांबद्दल केलेली चर्चा, त्यांची बेताल बोलण्याची शैली यामुळे काँग्रेसपासून लोक दूर जाऊ लागले. परिस्थिती काही तीच राहत नाही. राजकीय बदल उशिरा घडतात. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राहुल आणि त्यांचा पक्ष कॉंग्रेस हाच भाजपसमोर प्रमुख आव्हान देऊ शकतो. त्यातच जनतेने प्रादेशिक पक्षांचे युग लादण्यास सुरुवात केली आहे. कदाचित हीच भीती भाजपला सतावत असेल.

Follow Us
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली.
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा.
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.