AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘गजनी’तील आमिर खानप्रमाणे, माजी कृषिमंत्र्यांचा बोचरा वार

मुख्यमंत्र्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासठी आयुष मंत्रालयाने त्यांना च्यवनप्राश व आयुर्वेदिक औषध पाठवावे, असा सल्लाही अनिल बोंडेंनी दिला.

मुख्यमंत्र्यांची अवस्था 'गजनी'तील आमिर खानप्रमाणे, माजी कृषिमंत्र्यांचा बोचरा वार
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 15, 2020 | 1:42 PM
Share

उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माजी कृषिमंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘गजनी’ सिनेमातील विस्मरण होणाऱ्या आमिर खानच्या व्यक्तिरेखेसारखी झाल्याचा घणाघात बोंडेंनी केला. सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली. (former Agriculture Minister Anil Bonde compares Uddhav Thackeray with Amir Khan in Ghajini Movie)

उद्धव ठाकरे यांची अवस्था ‘गजनी’ सिनेमात विस्मरण होणाऱ्या आमिर खानसारखी झाली आहे. मुख्यमंत्र्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासठी आयुष मंत्रालयाने त्यांना च्यवनप्राश व आयुर्वेदिक औषध पाठवावे, असा सल्लाही अनिल बोंडेंनी दिला. ‘गजनी’ सिनेमात आमिर खानसाने साकारलेल्या संजय सिंघानिया या व्यक्तिरेखेला विस्मरणाचा आजार जडला होता.

“मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी कोराडवाहूला 25 हजार आणि बागायतीला हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊ अशी मागणी केली होती, याचा त्यांना विसर पडला.  सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. सरकार मुर्दाड झालं आहे. सरकारने कर्ज काढावे, स्वतः गहाण राहावं, पण शेतकऱ्यांना मदत करावी” अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.

“सध्या शेतकऱ्यांचे कुटुंब वाऱ्यावर आहे. मुख्यमंत्री व सत्ताधारी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप आलेले नाहीत. कारण सगळे जण आपल्या कुटुंबासोबत आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी हेच त्यांच्यासाठी मोठं आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबाची त्यांना काळजी नाही. उद्धव ठाकरे यांनी मंत्री व आमदारांना आपल्या कुटुंबासोबत राहावं आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळा असे आदेश दिले आहेत. शेतकरी यांना माफ करणार नाहीत, फटके मारतील” अशी टीकाही अनिल बोंडेंनी केली.

“संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि बंगालच्या उपसागरातील पट्ट्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अद्याप पंचनामे झालेले नाहीत. पंचनामे झाले तरी आम्ही मदत देऊ शकत नाही, असं कृषिमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन हातचं गेलं, तुरीमध्ये पाणी आहे, कापसाची पात्या-बोंडं गळून पडली, कांद्याचं अतोनात नुकसान झालं आहे. सरकारने पंचनाम्याच्या भानगडीत पडण्याऐवजी जिथे पावसामुळे नुकसान झालं, तिथे सरसकट नुकसान भरपाई द्यावी. मागच्या वेळी आम्ही जो जीआर काढला, एनडीआरएफ-एसडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट नुकसान भरपाई द्यावी” अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

कृत्रिम पावसासाठी रडार सज्ज, फक्त ढगांची प्रतिक्षा: कृषीमंत्री अनिल बोंडे

खडसे ते बोंडे, ‘त्या’ केबिनमध्ये राजकीय कारकीर्दीची अखेर, मंत्रालयात राजकीय अंधश्रद्धा

(former Agriculture Minister Anil Bonde compares Uddhav Thackeray with Amir Khan in Ghajini Movie)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ