AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमध्ये धक्कातंत्र सुरुच, आणखी चार दिग्गजांचे राजीनामे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षही राजीनामा देत आहेत. पंजाब आणि मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिलाय. विविध राज्यातील 13 वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी काँग्रेसच्या चार प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे पाठवले आहेत. नांदेडकरांना गृहीत धरणं महागात, अशोक चव्हाणांच्या पराभवाचं सखोल […]

काँग्रेसमध्ये धक्कातंत्र सुरुच, आणखी चार दिग्गजांचे राजीनामे
| Edited By: | Updated on: May 27, 2019 | 5:33 PM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षही राजीनामा देत आहेत. पंजाब आणि मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिलाय. विविध राज्यातील 13 वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी काँग्रेसच्या चार प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे पाठवले आहेत.

नांदेडकरांना गृहीत धरणं महागात, अशोक चव्हाणांच्या पराभवाचं सखोल विश्लेषण

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पंजाबमधील प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, झारखंडचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार आणि आसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी राजीनामा राहुल गांधींना पाठवलाय. जाखड यांचा स्वतःचाच सनी देओलविरुद्ध गुरदासपूरमधून पराभव झालाय. तर अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पराभव झालाय.

मी राजीनामा दिलाय, आता राहुल गांधींनी ठरवावं : अशोक चव्हाण

यापूर्वी यूपीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि ओदिशाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही राजीनामा दिलाय. काँग्रेससाठी सध्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतली. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक जिंकूनही लोकसभेत एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही दिल्लीत बोलावलं जाऊ शकतं.

माजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ते माजी मुख्यमंत्री, दिग्गजांचा पराभव

सुनील जाखड यांचा भाजप उमेदवार आणि अभिनेता सनी देओलने गुरदासपूरमधून पराभव केला. काँग्रेसने पंजाबमध्ये 13 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. अकाली दल आणि भाजपने प्रत्येकी दोन, तर आपने एक जागा जिंकली. सुनील जाखड यांनी भावूक पत्र लिहिलंय. काँग्रेस अध्यक्षांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी मला पाठिंबा दिला. तरीही मी जागा वाचवू शकलो नाही. त्यामुळे या पदावर राहणं माझ्यासाठी शक्य नाही, असं जाखड यांनी म्हटलंय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.