AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात गोवरची साथ किती गंभीर? आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले….

गोवरमुळे आतापर्यंत 14 बालमृत्यू झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात गोवरची साथ किती गंभीर? आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले....
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 30, 2022 | 4:20 PM
Share

मुंबईः महाराष्ट्रात गोवरची साथ कुठे कुठे पसरली आहे, याबद्दल महत्त्वाची माहिती आज आरोग्यमंत्री (Health minister) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिली. महाराष्ट्रात मुंबईत पहिल्यांदा या आजाराचे रुग्ण सापडले. त्यानंतर इतर जिल्ह्यात याचा प्रसार झाला. राज्यात 26 ठिकाणी गोवरचा (Govar) उद्रेक झाला असून सध्या राज्यातील गोवरच्या सक्रिय रुग्णांची संख्या 700 एवढी झाली आहे. मात्र राज्यभरात जवळपास 825 आरोग्य पथकांद्वारे गोवरची साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

आरोग्य मंत्र्यांनी आणखी काय सांगितलं?

  •  मुंबई, मालेगाव, भिवंडी, औरंगाबाद, सोलापूरमध्ये गोवरची साथ पसरत आहे. याची सुरुवात मुंबईत झाली.
  •  राज्यात 825 आरोग्य पथकांद्वारे गोवर प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच रुग्णांबाबत कशी काळजी घ्यायची, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे.
  •  काही आठवड्यांपूर्वी मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात 77 पेशंट होते. 10-12 रुग्ण गंभीर होते. मात्र आता रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण कमी आहे.
  •  गोवरमुळे आतापर्यंत 14 बालमृत्यू झाले. त्यापैकी एका बालकाचं लसीकरण झालं होतं. बाकीच्याचं लसीकरण झालं नव्हतं. 0 ते 11 महिने या वयोगटातील 12 ते 24 महिने 8 बालकांचा मृत्यू, 25 ते 60 महिने यात दोन बालकांचा मृत्यू झाला.
  •  मृत्यू झालेल्या या 14बालकांमध्ये बाकीचेही काही आजार असतील, त्याचा सविस्तर अहवाल सादर होईल. गोवर विरोधात प्रभावीपणे योजना राबवली जात आहे.
  • रुग्णांना वेळोवेळी अ जीवनसत्वाची मात्रा पुरवली जात आहे.  रुबेला पहिला डोस झालेल्यांची संख्या 8,654 एवढी आहे. तर रुबेला दुसरा डोस 6,620 एवढी आहे.
  •  ज्या बालकाला गोवरचा संसर्ग झाला आहे, त्याला 7 दिवस एकाच ठिकाणी ठेवणे. पूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्याला स्थलांतरास परवानगी देणे, अशा उपयायोजना सुरु आहेत.

 पाहा तानाजी सावंत काय म्हणाले?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.