AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात गोवरची साथ किती गंभीर? आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले….

गोवरमुळे आतापर्यंत 14 बालमृत्यू झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात गोवरची साथ किती गंभीर? आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले....
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 30, 2022 | 4:20 PM
Share

मुंबईः महाराष्ट्रात गोवरची साथ कुठे कुठे पसरली आहे, याबद्दल महत्त्वाची माहिती आज आरोग्यमंत्री (Health minister) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिली. महाराष्ट्रात मुंबईत पहिल्यांदा या आजाराचे रुग्ण सापडले. त्यानंतर इतर जिल्ह्यात याचा प्रसार झाला. राज्यात 26 ठिकाणी गोवरचा (Govar) उद्रेक झाला असून सध्या राज्यातील गोवरच्या सक्रिय रुग्णांची संख्या 700 एवढी झाली आहे. मात्र राज्यभरात जवळपास 825 आरोग्य पथकांद्वारे गोवरची साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

आरोग्य मंत्र्यांनी आणखी काय सांगितलं?

  •  मुंबई, मालेगाव, भिवंडी, औरंगाबाद, सोलापूरमध्ये गोवरची साथ पसरत आहे. याची सुरुवात मुंबईत झाली.
  •  राज्यात 825 आरोग्य पथकांद्वारे गोवर प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच रुग्णांबाबत कशी काळजी घ्यायची, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे.
  •  काही आठवड्यांपूर्वी मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात 77 पेशंट होते. 10-12 रुग्ण गंभीर होते. मात्र आता रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण कमी आहे.
  •  गोवरमुळे आतापर्यंत 14 बालमृत्यू झाले. त्यापैकी एका बालकाचं लसीकरण झालं होतं. बाकीच्याचं लसीकरण झालं नव्हतं. 0 ते 11 महिने या वयोगटातील 12 ते 24 महिने 8 बालकांचा मृत्यू, 25 ते 60 महिने यात दोन बालकांचा मृत्यू झाला.
  •  मृत्यू झालेल्या या 14बालकांमध्ये बाकीचेही काही आजार असतील, त्याचा सविस्तर अहवाल सादर होईल. गोवर विरोधात प्रभावीपणे योजना राबवली जात आहे.
  • रुग्णांना वेळोवेळी अ जीवनसत्वाची मात्रा पुरवली जात आहे.  रुबेला पहिला डोस झालेल्यांची संख्या 8,654 एवढी आहे. तर रुबेला दुसरा डोस 6,620 एवढी आहे.
  •  ज्या बालकाला गोवरचा संसर्ग झाला आहे, त्याला 7 दिवस एकाच ठिकाणी ठेवणे. पूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्याला स्थलांतरास परवानगी देणे, अशा उपयायोजना सुरु आहेत.

 पाहा तानाजी सावंत काय म्हणाले?

Follow Us
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर