AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : लोकसभेत गट निर्माण केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल; राऊतांचा इशारा

शिवसेनेतील आमदारांपासून सुरु झालेले बंड नगरसेवक, जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, महापौर याद्वारे आता खासदारांपर्यंत पोहचले आहे. शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड करुन शिंदे गट बनवला आहे. एवढेच नाही तर हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, बंडखोर आमदार अपात्र असून त्यांच्यावर कारवाई व्हावी याबाबत शिवसेनेने याचिका दाखल केली आहे.

Sanjay Raut : लोकसभेत गट निर्माण केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल; राऊतांचा इशारा
खा. संजय राऊतImage Credit source: tv9
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 18, 2022 | 6:50 PM
Share

मुंबई : राज्यात (Shiv sena) शिवसेना आमदारांच्या बंडानंतर हे लोण आता लोकसभेतही निर्माण झाले आहे. (Shiv Sena MP) शिवसेनेतील 12 खासदर हे शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, या खासदारांनी लोकसभेत गट निर्माण केला तर त्यांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ज्याप्रमाणे राज्य विधीमंडळात आमदारांनी गट निर्माण केल्यानंतर शिवसेना कोर्टात गेली त्याच प्रकारे खासदारांनी भूमिका घेतली तर येथेही कोर्टात जाणार असल्याचा इशारा (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात तेच देशाच्या राजकारणात घडताना पाहवयास मिळत आहे. शिवसेनेतील 12 खासदारांनी शिंदे गटात सहभाग नोंदवल्यानंतर लागलीच शिवेसेनेच्यावतीने खा. संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. त्यामुळे खासदारांच्या भूमिकेवर काय परिणाम होणार का हे पहावे लागणार आहे.

राज्याची पुन्नरावृत्ती दिल्लीच्या राजकारणात

शिवसेनेतील आमदारांपासून सुरु झालेले बंड नगरसेवक, जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, महापौर याद्वारे आता खासदारांपर्यंत पोहचले आहे. शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड करुन शिंदे गट बनवला आहे. एवढेच नाही तर हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, बंडखोर आमदार अपात्र असून त्यांच्यावर कारवाई व्हावी याबाबत शिवसेनेने याचिका दाखल केली आहे. 20 जुलै रोजी याची सुनावणी असून त्यानंतरच काय होणार ते समोर येणार आहे. तर दुसरीकडे खासदारांनीही आपला गट शिंदे गटात सहभागी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश करुन कार्यकरणी देखील स्थापित केली आहे.

शिवसेना हा पक्ष आणि इतर गट

बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला शिवसेना हाच खरा पक्ष आहे. इतर जे आहेत ते गट आहेत. आणि गटांना कार्यकरणी बरखास्त करण्याचा अधिकार दिला कुणी असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. जे पक्षात आहेत तेच खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे यासंदर्भात कोणी वेगळी भूमिका घेतली तर याचिका दाखल करुन न्यायालयीन लढाई लढली जाईल असाही इशारा राऊतांनी दिला आहे.

पक्षावर कोणताही परिणाम नाही

शिवसेना पक्षाची स्थापनाच ही संघर्षातून झाली आहे. त्यामुळे आमदार आणि खासदारांनी पक्ष सोडला शिवसैनिक हे बरोबर आहेत. त्यामुळे याचा काही परिणाम पक्षावर होणार नाही. ग्राउंड स्तरावर वेगळे चित्र आहे. शिवसैनिकांच्या जोरावर पक्ष पुन्हा उभारी घेईल यामध्ये शंका नाही. अनेकांनी बंडखोरी करीत गट निर्माण केले. पण शिवसेना पक्ष हा कायम राहिल आणि खासदारांच्या बंडाने देखील पक्षावर परिणाम होणार नसल्याचा विश्वास त्यांनी राऊतांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल