AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेतून खैरेंविरोधात इम्तियाज जलील यांची उमेदवारी जवळपास निश्चित

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादची जागा एमआयएमसाठी सोडण्याचा निर्णय घेतलाय. या जागेवर एमआयएमचे औरंगाबादमधील आमदार इम्तियाज जलील इच्छुक आहेत. त्यांच्यासाठीच ही जागा सोडण्यात आली आहे. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. वंचित बहुजन आघाडीने 37 जागा जाहीर केल्या आहेत, उर्वरित 11 जागा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करुन जाहीर करु, असंही […]

औरंगाबादेतून खैरेंविरोधात इम्तियाज जलील यांची उमेदवारी जवळपास निश्चित
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:16 PM
Share

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादची जागा एमआयएमसाठी सोडण्याचा निर्णय घेतलाय. या जागेवर एमआयएमचे औरंगाबादमधील आमदार इम्तियाज जलील इच्छुक आहेत. त्यांच्यासाठीच ही जागा सोडण्यात आली आहे. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. वंचित बहुजन आघाडीने 37 जागा जाहीर केल्या आहेत, उर्वरित 11 जागा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करुन जाहीर करु, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मी असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा केली आणि ते औरंगाबादमधून उमेदवार देण्यासाठी तयार आहेत. एमआयएमकडूनच नाव जाहीर केलं जाईल. आम्ही त्यांना मुंबईतून लढण्याचीही विनंती केली आहे. मुंबईतून लढायचं की नाही याबाबत ओवेसी पुढच्या दोन दिवसात निर्णय घेतील, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून एमआयएमने उमेदवार द्यावा, असं आंबेडकर म्हणाले. या मतदारसंघात सध्या भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत.

इम्तियाज जलील यांच्याकडून जागेची मागणी

वंचित बहुजन आघाडी औरंगाबादेतून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. पण यावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप होता. यासाठी त्यांनी ओवेसींशी संपर्क साधून औरंगाबादची जागा एमआयएमला सोडण्याची मागणी केली.

मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, ही भावना मी माझ्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहे. याबाबत दोन दिवसात निर्णय होईल. न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील हे चांगले जस्टीस आहेत, विधीज्ञ आहेत, पण त्यांना औरंगाबादेत कुणी ओळखत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे कार्यकर्ते त्यांचं काम करतील असं वाटत नाही. मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, पण याबाबत मला मुंबईच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला होता पण मी त्यांना नकार कळवला. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी दोनच दिवसात औरंगाबाद लोकसभेबाबत निर्णय घेतील. जवळपास निर्णय होत आलाय दोन दिवसात याबाबत सगळं काही स्पष्ट होईल, अशी माहिती एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिली होती.

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमध्ये औरंगाबादची जागा शिवसेनेकडे आहे. यावेळीही विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनाच शिवसेनेकडून तिकीट देण्यात येणार आहे. त्यामुळे खैरेंविरोधात आता जलील मैदानात असतील. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. आघाडीकडून औरंगाबादसाठी उमेदवार अजून जाहीर झालेला नाही.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक