AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार है तो मुमकिन है..! 15 मिनिटांमध्ये मिटवली पक्षांतर्गत नाराजी; नेमकं काय घडलं?

पक्षांतर्गत काय आणि बाहेरील प्रश्न काय? शरद पवारांसमोर गेल्यावर मार्ग हा निघणारच हेच यातून अधिरोखित झाले आहे.

पवार है तो मुमकिन है..! 15 मिनिटांमध्ये मिटवली पक्षांतर्गत नाराजी; नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 18, 2022 | 4:41 PM
Share

पुणे : केवळ शिवसेनेमध्येच नाराजीचे सत्र असे नाहीतर (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादीमध्येही पक्षांतर्गत नाराजी ही सुरुच आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (Sharad Pawar) शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळे अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत नसले तरी गेल्या काही दिवसांपासून (Jayant Patil) प्रदेशाध्य जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामधील मतभेद हे लपून राहिलेले नव्हते. शिवाय दिल्ली येथील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये तर ते अधिक ठळकपणे जाणवले गेले होते. त्यामुळे हे मतभेद मिटणार कधी असा सवाल उपस्थित होत होता. अखेर शरद पवार यांनी जयंत पाटील आणि अजित पवार यांची बैठक घेऊन त्यांचे मनोमिलन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत काय आणि बाहेरील प्रश्न काय? शरद पवारांसमोर गेल्यावर मार्ग हा निघणारच हेच यातून अधिरोखित झाले आहे.

4 दिवासांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद पार पडली. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बोलू देण्याची संधीच मिळाली नाही. यावरुन ते नाराज असल्याची चर्चा होती. तर त्यावेळी जयंत पाटील यांना त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

राष्ट्रीय परिषद असल्याने यामध्ये आपण मनोगत व्यक्त करणे हे काही बरोबर नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. तर पक्षात अंतर्गत मतभेद नसल्याचेही ते म्हणाले होते. पण जयंत पाटील आणि अजित पवारामध्ये विरोधी पक्षनेते पद आणि इतर कारणांवरुन मतभेद होते.

पुणे येथे रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठक सुरु होण्यापूर्वी शरद पवार यांनी जयंत पाटील, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची एक बैठक घेतली. यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील मतभेद दूर केल्याची चर्चा आहे. 15 मिनिट ही बैठक सुरु होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.