AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवेंद्र फडणवीस आमचं शत्रू नाहीत,पण ते काम….,’ काय म्हणाले मनोज जरांगे पाटील

मी आंदोलन समाजाच्या हितासाठी करत आहे माझ्या स्वार्थासाठी नाही. प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे मरणाची भीती नाही वाटत, समाज मोठा झाला पाहिजे असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

'देवेंद्र फडणवीस आमचं शत्रू नाहीत,पण ते काम....,' काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
devendra fadnavis and manoj jarange patil
| Updated on: Aug 30, 2024 | 3:10 PM
Share

देवेंद्र फडणवीस काही आमचे शत्रू नाहीत परंतू ते काम देखील नीट करीत नाहीत. जनतेची भावना ते समजून घेत नाहीत. आम्हाला सहज घेत आहेत. हिनविल्या सारखं बोलत आहेत. ते लोकशाहीत ते राजा आहेत, तुम्हाला लोकांची माया आली पाहिजे.धनगर बांधवांचे प्रश्न नाही सुटलेले नाहीत,ओबीसी बांधवाचं तसच. शेतकऱ्यांसाठी थातूरमातूर योजना देऊन लोकांना वेड्यात काढत आहेत आणि पुन्हा सत्तेवर बसणार आहेत असे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की ओबीसीत मराठा आरक्षण असताना देखील ते आम्हाला आरक्षण देत नाहीत. अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, मराठ्यांच्या विरोधात जाल तर तुमचा पक्ष संपून जाईल. देवेंद्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मराठा आरक्षणावर काम करू देत नाहीत, हैदराबाद येथील नोंदी का आणू देत नाहीत..? असाही सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. गुन्हे मागे घ्यायचे तर ते गुन्हे वाढतच चालले आहेत.तर सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची देखील अंमलबजावणी केली जात नाही.मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.जातिवंत मराठा भाजप पक्षात राहणार नाही आणि एकही माणसाला निवडून आणू येऊ देणार नाही असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

पुण्यात मराठा बांधवांची बैठक

आपण उद्या मालवण आणि पुण्याच्या दौऱ्यावर निघणार आहोत. उद्या मालवण येथे मुक्काम असणार आहे आणि एक तारखेला राजकोट येथील शिवरायांच्या किल्ल्याला आपण भेट देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. एक तारखेलाच मालवणहून पुण्यामध्ये राजगुरुनगर येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात जाणार आहोत.एक तारखेला पुण्यात मुक्काम असणार आहे. दोन तारखेला भीमाशंकर येथे दर्शन करून पुण्यामध्ये मराठा बांधवांची बैठक घेणार आहे. तीन तारखेला शिवाजीनगर येथील न्यायालयात तारखेसाठी हजर राहणार आहे असा कार्यक्रम जरांगे यांनी सांगितला आहे.

अनिल बोंडेंना आम्ही गिनतच नाही

अनिल बोंडे यांना आम्ही गिनतच नाही. हे सगळे मिळून फडणवीसला पाडणार आहेत, भाजप पक्ष संपवून टाकणार आहेत. एक वर्ष झाले आम्ही सरकारवर विश्वास ठेवला आहे आणखी किती विश्वास ठेवायला हवा. फडणवीस हे इतर मंत्र्यांना काम करू देत नाहीत हे आम्हाला माहित आहे. आम्ही ज्या व्यक्तीला बोलतो त्यांनी आमच्याशी बोलावं आम्ही ज्यांना बोलत नाही त्यांनी आमच्याशी बोलू नये असाही अनिल बोंडे यांना त्यांनी सल्ला दिला.

तर माझ्या कानाला धरा

सगळे सोयरे आणि इतर प्रश्नांवर सरकारसोबत या दोन दिवसात चर्चा झालेली नाही. शिरसाठ साहेब एवढे बोलत आहेत तर त्यांनी मराठ्यांचा प्रश्न लवकर मार्गी लागेल असे बघावे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. भाजपच्या आणि अजित पवार यांच्या गटातील लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगावं, आरक्षण देऊन टाका नाहीतर राज्यातला खेळ सगळा बिघडून जाणार आहे. ज्यांना आपला नेता आणि पक्ष बाप वाटत आहे त्यांनी त्याला सांगावं, आरक्षण देऊन टाका..आम्ही त्यांच्यावर एक शब्दही बोलणार नाहीत आणि जर बोललो तर माझ्या कानाला धरा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...