AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवेंद्र फडणवीस आमचं शत्रू नाहीत,पण ते काम….,’ काय म्हणाले मनोज जरांगे पाटील

मी आंदोलन समाजाच्या हितासाठी करत आहे माझ्या स्वार्थासाठी नाही. प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे मरणाची भीती नाही वाटत, समाज मोठा झाला पाहिजे असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

'देवेंद्र फडणवीस आमचं शत्रू नाहीत,पण ते काम....,' काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
devendra fadnavis and manoj jarange patil
| Updated on: Aug 30, 2024 | 3:10 PM
Share

देवेंद्र फडणवीस काही आमचे शत्रू नाहीत परंतू ते काम देखील नीट करीत नाहीत. जनतेची भावना ते समजून घेत नाहीत. आम्हाला सहज घेत आहेत. हिनविल्या सारखं बोलत आहेत. ते लोकशाहीत ते राजा आहेत, तुम्हाला लोकांची माया आली पाहिजे.धनगर बांधवांचे प्रश्न नाही सुटलेले नाहीत,ओबीसी बांधवाचं तसच. शेतकऱ्यांसाठी थातूरमातूर योजना देऊन लोकांना वेड्यात काढत आहेत आणि पुन्हा सत्तेवर बसणार आहेत असे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की ओबीसीत मराठा आरक्षण असताना देखील ते आम्हाला आरक्षण देत नाहीत. अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, मराठ्यांच्या विरोधात जाल तर तुमचा पक्ष संपून जाईल. देवेंद्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मराठा आरक्षणावर काम करू देत नाहीत, हैदराबाद येथील नोंदी का आणू देत नाहीत..? असाही सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. गुन्हे मागे घ्यायचे तर ते गुन्हे वाढतच चालले आहेत.तर सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची देखील अंमलबजावणी केली जात नाही.मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.जातिवंत मराठा भाजप पक्षात राहणार नाही आणि एकही माणसाला निवडून आणू येऊ देणार नाही असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

पुण्यात मराठा बांधवांची बैठक

आपण उद्या मालवण आणि पुण्याच्या दौऱ्यावर निघणार आहोत. उद्या मालवण येथे मुक्काम असणार आहे आणि एक तारखेला राजकोट येथील शिवरायांच्या किल्ल्याला आपण भेट देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. एक तारखेलाच मालवणहून पुण्यामध्ये राजगुरुनगर येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात जाणार आहोत.एक तारखेला पुण्यात मुक्काम असणार आहे. दोन तारखेला भीमाशंकर येथे दर्शन करून पुण्यामध्ये मराठा बांधवांची बैठक घेणार आहे. तीन तारखेला शिवाजीनगर येथील न्यायालयात तारखेसाठी हजर राहणार आहे असा कार्यक्रम जरांगे यांनी सांगितला आहे.

अनिल बोंडेंना आम्ही गिनतच नाही

अनिल बोंडे यांना आम्ही गिनतच नाही. हे सगळे मिळून फडणवीसला पाडणार आहेत, भाजप पक्ष संपवून टाकणार आहेत. एक वर्ष झाले आम्ही सरकारवर विश्वास ठेवला आहे आणखी किती विश्वास ठेवायला हवा. फडणवीस हे इतर मंत्र्यांना काम करू देत नाहीत हे आम्हाला माहित आहे. आम्ही ज्या व्यक्तीला बोलतो त्यांनी आमच्याशी बोलावं आम्ही ज्यांना बोलत नाही त्यांनी आमच्याशी बोलू नये असाही अनिल बोंडे यांना त्यांनी सल्ला दिला.

तर माझ्या कानाला धरा

सगळे सोयरे आणि इतर प्रश्नांवर सरकारसोबत या दोन दिवसात चर्चा झालेली नाही. शिरसाठ साहेब एवढे बोलत आहेत तर त्यांनी मराठ्यांचा प्रश्न लवकर मार्गी लागेल असे बघावे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. भाजपच्या आणि अजित पवार यांच्या गटातील लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगावं, आरक्षण देऊन टाका नाहीतर राज्यातला खेळ सगळा बिघडून जाणार आहे. ज्यांना आपला नेता आणि पक्ष बाप वाटत आहे त्यांनी त्याला सांगावं, आरक्षण देऊन टाका..आम्ही त्यांच्यावर एक शब्दही बोलणार नाहीत आणि जर बोललो तर माझ्या कानाला धरा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

Follow Us
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...