AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर संजय निरुपम यांच्या हाती शिवबंधन! 19 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी

संजय निरुपम यांनी शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी पुन्हा पक्षात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेना पासूनच आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली होती. काँग्रेसकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

अखेर संजय निरुपम यांच्या हाती शिवबंधन! 19 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी
संजय निरुपम
| Updated on: May 03, 2024 | 10:04 PM
Share

काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते संजय निरुपम यांनी आज अखेर शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज पार पडला. संजय निरुपम यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा आज शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संजय निरुपम यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. संजय निरुपम हे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण ठाकरे गटाने या ठिकाणी अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संजय निरुपम संतापले आणि त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली. परिणामी, काँग्रेसने आघाडी धर्माचं पालन न केल्याने पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तब्बल 6 वर्षांसाठी निलंबित केलं.

काँग्रेसच्या कारवाईनंतर संजय निरुपम हे शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर याबाबत माहिती जारी केली होती. संजय निरुपम यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यानंतर संजय निरुपम यांचा आज शिवसेना पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“मी संजय निरुपम यांचं स्वागत करतो. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक कार्यकर्तादेखील आता शिवसेनेसोबत जोडले गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संजय निरुपम यांना दोन वेळा राज्यसभेवर पाठवलं होतं. संजय निरुपम यावेळी लोकसभा निवडणूक लढवू इच्छुक होते. ते पक्षात सहभागी झाले आहेत. पण त्यांना त्यामोबदल्यात काहीच मिळालं नाही. हे माहिती असूनही त्यांनी ते शिवसेनेचं काम करण्यासाठी पक्षात सहभागी झाले. त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

तब्बल 19 वर्षांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश

संजय निरुपम यांनी शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी पुन्हा पक्षात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेना पासूनच आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली होती. गेल्या महिन्यात त्यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून पक्षशिस्तीचं पालन न केल्याचा ठपका ठेवत पक्षातून निलंबित करण्यात आलं. यानंतर आज संजय विरुपम यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. संजय निरुपम यांनी याआधी शिवसेनेचं हिंदी मुखपत्र ‘दोपहर का सामना’ या वृत्तपत्राचे संपादक देखील होते.

संजय निरुपम यांनी 2005 मध्ये शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांनी 2009 मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. विशेष म्हणजे त्यांनी त्यावेळी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यांनी गेल्या 19 वर्षात काँग्रेस पक्षात अनेक पदांवर काम केलं आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.