AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकार डिसेंबरपर्यंतच राहणार, त्यानंतर भाजप सत्तेवर येणार, नगरच्या ‘किंगमेकर’चा दावा

काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसशासित नगरपालिकांना निधी देत नसल्याची खंत बोलून दाखविली होती. | Maha Vikas Aghadi govt

ठाकरे सरकार डिसेंबरपर्यंतच राहणार, त्यानंतर भाजप सत्तेवर येणार, नगरच्या 'किंगमेकर'चा दावा
| Updated on: Nov 03, 2020 | 8:48 PM
Share

अहमदनगर: राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार येत्या डिसेंबर महिन्यापर्यंतच टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा दावा भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. शिवाजी कार्डिले हे नगर जिल्ह्यातील सामर्थ्यशाली नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेले आहेत. (BJP leader Shivaji Kardile claims Maha Vikas Aghadi govt will collapse in December)

काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसशासित नगरपालिकांना निधी देत नसल्याची खंत बोलून दाखविली होती. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास कसे उत्सुक नव्हते, या आठवणीलाही त्यांनी उजाळा दिला होता. त्यामुळे महाविकासआघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले होते. परिणामी आता शिवाजी कार्डिले यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाविकासआघाडीचे सरकार पुढची पाच वर्षे सोडा, किती काळ टिकेल, हे आता जनताच सांगेल. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. पण महाविकासआघाडीचे सरकार फार तर डिसेंबर महिन्यापर्यंत टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असे भाकीत कार्डिले यांनी वर्तविले. त्यांच्या या वक्तव्याच्या आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल. मला भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षात जायचे नाही. मला कोणीही संपर्क केला नाही आणि मला त्याची गरजही नाही, अशी पुस्तीही यावेळी शिवाजी कार्डिले यांनी जोडली.

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही; कर्डिलेंची स्पष्टोक्ती एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशानंतर कर्डीले यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा नगर जिल्ह्यात सुरू आहे. यावर शिवाजी कर्डिले यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचं नाही. तसेच माझ्याकडे कोणी संपर्क केला नाही आणि त्याची मला गरज नाही.

एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना माझ्यावर एक संकट आले होते. मला एका खोट्या गुन्हा मध्ये अडकवले होते. तेव्हा अन्यायाच्या विरोधात न्याय देण्याची भूमिका बजावण्यासाठी ते नगरमध्ये आले होते. त्यामुळेच त्यांचे आणि माझे जवळचे संबंध असल्यामुळे लोक तशी चर्चा करीत असतील. मात्र, ज्यावेळी ते राष्ट्रवादीत गेले त्यावेळी हा विषय संपला. मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचे नाही, असे कर्डिले यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

राज्यातील मविआ सरकार पाच वर्षे पूर्ण टिकणार- प्राजक्त तनपुरे

शरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार

(BJP leader Shivaji Kardile claims Maha Vikas Aghadi govt will collapse in December)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.