AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकार डिसेंबरपर्यंतच राहणार, त्यानंतर भाजप सत्तेवर येणार, नगरच्या ‘किंगमेकर’चा दावा

काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसशासित नगरपालिकांना निधी देत नसल्याची खंत बोलून दाखविली होती. | Maha Vikas Aghadi govt

ठाकरे सरकार डिसेंबरपर्यंतच राहणार, त्यानंतर भाजप सत्तेवर येणार, नगरच्या 'किंगमेकर'चा दावा
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 03, 2020 | 8:48 PM
Share

अहमदनगर: राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार येत्या डिसेंबर महिन्यापर्यंतच टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा दावा भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. शिवाजी कार्डिले हे नगर जिल्ह्यातील सामर्थ्यशाली नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेले आहेत. (BJP leader Shivaji Kardile claims Maha Vikas Aghadi govt will collapse in December)

काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसशासित नगरपालिकांना निधी देत नसल्याची खंत बोलून दाखविली होती. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास कसे उत्सुक नव्हते, या आठवणीलाही त्यांनी उजाळा दिला होता. त्यामुळे महाविकासआघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले होते. परिणामी आता शिवाजी कार्डिले यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाविकासआघाडीचे सरकार पुढची पाच वर्षे सोडा, किती काळ टिकेल, हे आता जनताच सांगेल. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. पण महाविकासआघाडीचे सरकार फार तर डिसेंबर महिन्यापर्यंत टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असे भाकीत कार्डिले यांनी वर्तविले. त्यांच्या या वक्तव्याच्या आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल. मला भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षात जायचे नाही. मला कोणीही संपर्क केला नाही आणि मला त्याची गरजही नाही, अशी पुस्तीही यावेळी शिवाजी कार्डिले यांनी जोडली.

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही; कर्डिलेंची स्पष्टोक्ती एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशानंतर कर्डीले यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा नगर जिल्ह्यात सुरू आहे. यावर शिवाजी कर्डिले यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचं नाही. तसेच माझ्याकडे कोणी संपर्क केला नाही आणि त्याची मला गरज नाही.

एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना माझ्यावर एक संकट आले होते. मला एका खोट्या गुन्हा मध्ये अडकवले होते. तेव्हा अन्यायाच्या विरोधात न्याय देण्याची भूमिका बजावण्यासाठी ते नगरमध्ये आले होते. त्यामुळेच त्यांचे आणि माझे जवळचे संबंध असल्यामुळे लोक तशी चर्चा करीत असतील. मात्र, ज्यावेळी ते राष्ट्रवादीत गेले त्यावेळी हा विषय संपला. मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचे नाही, असे कर्डिले यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

राज्यातील मविआ सरकार पाच वर्षे पूर्ण टिकणार- प्राजक्त तनपुरे

शरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार

(BJP leader Shivaji Kardile claims Maha Vikas Aghadi govt will collapse in December)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
मोदींच्या निवस्थानाबाहेर राहुल गांधींना घातपात करायचा होता का? -शिंदे
मोदींच्या निवस्थानाबाहेर राहुल गांधींना घातपात करायचा होता का? एकनाथ शिंदेंच्या विधानाने खळबळ
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?