AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big News: विधानभवनाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, रॉकेल अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न

विधानभवनाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.  कांदळगावच्या एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Big News: विधानभवनाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, रॉकेल अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 23, 2022 | 1:00 PM
Share

मुंबई : विधानभवनाच्या (Vidhanbhavan) बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.  कांदळगावच्या एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी आज विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न

विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. अधिवेशनावेळी साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी आज विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुभाष देशमुख यांनी विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. चौथा दिवस देखील अपेक्षेप्रमाणे वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाचे तीन दिवस विरोधकांच्या आंदोलनाने आणि घोषणाबाजीने चांगलेच गाजले. विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वेगवेगळ्या मागण्या केल्या. सध्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा गाजत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी आवाज उठवलाय. दुसरीकडे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेतून सरपंच निवडीबाबतचे विधेयक मांडले. मात्र या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगल्याचे पहायला मिळाले. आजदेखील विधिमंडळात अनेक प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौथा दिवस देखील वादळी ठरू शकतो.

आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी 50-50 बिस्कीटांचे पुडे घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. आमच्या हातात 50-50 बिस्कीटांचे पुडे आहेत मात्र त्यांच्या हातात काय आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकारमध्ये आता मंत्री असलेले त्यावेळी गुवाहाटीला का गेले असा सवाल त्यांनी केला. मंत्री महोदय यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आपल्याला 50 खोके हवेत का असे बोलले होते. सत्तेच्या मस्तीत अशी उत्तर कोण देऊ शकतो का, असा संतप्त सवाल शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.