AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप? थेट हर्षवर्धन सपकाळांना हटवण्यासाठी राहुल गांधी… नेमकं काय घडलं?

काँग्रेसच्या नाराज गटाने राहुल गांधीच्या भेटीची वेळ मागितली आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे.

आता काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप? थेट हर्षवर्धन सपकाळांना हटवण्यासाठी राहुल गांधी... नेमकं काय घडलं?
Rahul GandiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 16, 2026 | 11:09 AM
Share

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठी उथलथापालथ दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हटविण्याच्या मागणीसाठी नाराज गटाने आता थेट उच्च नेतृत्वाकडे मोर्चा वळवला आहे. नागपूर आणि मराठवाड्यातील नाराज नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतल्यानंतर आज राहुल गांधी यांची भेट घेण्याची वेळ मागितली आहे.

नेमकं काय घडलं?

काल मराठवाड्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आज या गटाकडून राहुल गांधी यांची भेट घेऊन सपकाळ यांना हटविण्याची मागणी अधिक आक्रमकपणे होताना दिसत आहे. यापूर्वीही काही आमदार आणि जिल्हा नेत्यांनी हायकमांडकडे सपकाळ यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र आता ही मोहीम अधिक संघटित आणि जोरदार झाली आहे.

कोण आहेत नाराज नेते?

दिल्लीत दाखल झालेल्या नाराज गटात प्रमुखपणे खालील नेते सहभागी आहेत:

-माजी मंत्री अनिल पटेल

-माजी आमदार नामदेव पवार

-नेते संजय राठोड

-माजी खासदार तुकाराम रेंगे

तसेच इतर अनेक जिल्हास्तरीय नेते

हे नेते मुख्यतः नागपूर आणि मराठवाडा विभागातील आहेत.

नेमकं काय घडलं?

गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती दयनीय झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची संघटना कमकुवत झाल्याचे चित्र आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये असंतोष वाढला असून, अनेक ठिकाणी बंडखोरीचे संकेत दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नाराज गटाचा दावा आहे की, सपकाळ यांच्या काळात पक्षाची एकजूट तुटली आहे आणि सत्तेत सहभागी होण्याची संधी गमावली गेली. त्यामुळे पक्षाला मजबूत करण्यासाठी नवीन नेतृत्वाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

काय होणार पुढे?

राहुल गांधी यांची भेट कशी होते आणि त्यात काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. जर उच्च कमांडने नाराज गटाच्या मागणीला गांभीर्याने घेतले तर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षातील अंतर्गत कलह अधिक चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हायकमांड काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. ही घटना महाराष्ट्रात आगामी राजकीय घडामोडींना नवी दिशा देऊ शकते.

Follow Us
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?
7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार..
मोठी बातमी! 7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार....
महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ
Fuel Price Hike | महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ, सर्वसामान्य हैराण!
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...