AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकांमध्ये आघाडी करायची का?, काँग्रेसचं तीन दिवस मंथन; मॅरेथॉन बैठकीकडे सर्वांचं लक्ष

राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस आघाडी करणार का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. (maharashtra congress holds party meeting in mumbai )

महापालिका निवडणुकांमध्ये आघाडी करायची का?, काँग्रेसचं तीन दिवस मंथन; मॅरेथॉन बैठकीकडे सर्वांचं लक्ष
nana patole
| Updated on: Feb 21, 2021 | 1:46 PM
Share

मुंबई: राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस आघाडी करणार का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. या प्रश्नाचं लवकरच उत्तर मिळण्याची शक्यता आहे. कारण येत्या 24 फेब्रुवारीपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत काँग्रेसची मुंबईत मॅरेथॉन बैठक होणार असून त्यात महापालिका निवडणुकांबाबतच्या आघाडीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या तीन दिवसाच्या बैठकीत काँग्रेस काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. (maharashtra congress holds party meeting in mumbai )

पटोलेंची पहिलीच बैठक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार 23 फेब्रुवारी रोजी प्रदेश काँग्रेसच्या निवड मंडळाची (पार्लमेंटरी बोर्ड) बैठक महिला विकास महामंडळ, नरिमन पाईंट येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

कृषी कायद्यांवरही चर्चा

या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहिम राबविण्याबाबतही या बैठकीत रणनिती ठरवली जाणार आहे.

मुंबई-ठाण्यातील जिल्हा कमिट्यांशी चर्चा

राज्यातील आगामी ५ महानगरपालिका तसेच ९८ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधणीसंदर्भातनाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नवी मुंबई शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी 12 वाजता कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी 2 वाजता वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटी व दुपारी 4 वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली जाणार आहे. तर गुरुवार 25 रोजी औरंगाबाद ग्रामीण व शहर, भंडारा, गोंदिया व ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होत आहे. शुक्रवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी यवतमाळ, चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाणार आहे तर संध्याकाळी 4 वाजता भिवंडी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. (maharashtra congress holds party meeting in mumbai )

संबंधित बातम्या:

ठरलं ! मुख्यमंत्री महाराष्ट्राशी रात्री 7 वाजता बोलणार, लॉकडाऊनचा संभ्रमही दूर करणार?

लॉकडाऊन, संचारबंदी, नवे हॉटस्पॉट, नवे निर्बंध, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात काय?; वाचा स्पेशल रिपोर्ट

मोठा निर्णय! पुण्यात सोमवारपासून ‘नियंत्रित संचार’, विवाह सोहळे, हॉटेल, महाविद्यालांना बंधने; वाचा काय काय असतील निर्बंध

(maharashtra congress holds party meeting in mumbai )

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.