AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसींचं राजकीय आरक्षण का गेलं?, मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सर्वांत मोठा दावा

ओबीसी नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेल्याचा आरोप करत केंद्राला 9 पत्रे पाठवूनही केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही, त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

ओबीसींचं राजकीय आरक्षण का गेलं?, मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सर्वांत मोठा दावा
मंत्री विजय वडेट्टीवार
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 11:38 AM
Share

औरंगाबाद : ओबीसी आरक्षण कुणामुळे गेलं?, यावरुन आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांनी बरेच आरोप प्रत्यारोप करुन झाले आहेत. आता ओबीसी नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठा दावा केलाय. केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेल्याचा आरोप करत केंद्राला 9 पत्रे पाठवूनही केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही, त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

केंद्रामुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं

विजय वडेट्टीवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी ओबीसी आरक्षणावरच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आरक्षण गेलं याला केंद्र सरकार कारणीभूत असल्याचा आरोप करत, 9 पत्रे पाठवूनही केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही, म्हणूनच ओबीसींचं आरक्षण गेल्याचं ते म्हणाले.

…तर ओबीसींचं आरक्षण टिकलं असतं!

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. राजकीय आरक्षण टिकलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. डाटा मिळवण्यासाठी आमच्यासह विरोधी पक्षानेही प्रयत्न केले पण केंद्राने तो डाटा दिला नाही. जर तो डेटा मिळाला असता तर ओबीसी आरक्षण टिकलं असतं, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. कपिल सिब्बल यांच्यामार्फत आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि आम्हाला डाटा देण्याची मागणी केली आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

संघर्षाशिवाय ओबीसी समाजाला काहीही मिळालं नाही

महाराष्ट्रातील ओबीसी आता आपल्या हक्कासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एकत्र येताना दिसत आहे, ही चांगली गोष्ट आहे. संघर्षाशिवाय ओबीसी समाजाला काहीही मिळालं नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

महाज्योतीसाठी 40 कोटी रुपये आम्हाला मिळाले आहेत. लवकरच औरंगाबादला महाज्योतिचे उपकेंद्र सुरु करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. महाज्योतीमधून यूपीएससीसाठी एक हजार मुलांना सिलेक्ट करण्याचं आम्ही ठरवलं आहे. महाज्योतीसाठी 15 दिवसांत जागेचा प्रश्न सोडवणार आहोत, अशी ग्वाहीदेखील वडेट्टीवार यांनी दिली.

((Maharashtra Minister Vijay Wadettiwar Allegation Modi GOVT Over OBC Reservation))

हे ही वाचा :

राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं आज नागपुरात अधिवेशन, ओबीसींची पुढची लढाई कशी, विचारमंथन होणार

ओबीसींच्या इम्पेरीकल डेटासाठी 435 कोटी द्या, अन्यथा झारीतील शुक्राचार्य कोण ते कळेल : चंद्रशेखर बावनकुळे

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.