AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसींचं राजकीय आरक्षण का गेलं?, मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सर्वांत मोठा दावा

ओबीसी नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेल्याचा आरोप करत केंद्राला 9 पत्रे पाठवूनही केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही, त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

ओबीसींचं राजकीय आरक्षण का गेलं?, मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सर्वांत मोठा दावा
मंत्री विजय वडेट्टीवार
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 11:38 AM
Share

औरंगाबाद : ओबीसी आरक्षण कुणामुळे गेलं?, यावरुन आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांनी बरेच आरोप प्रत्यारोप करुन झाले आहेत. आता ओबीसी नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठा दावा केलाय. केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेल्याचा आरोप करत केंद्राला 9 पत्रे पाठवूनही केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही, त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

केंद्रामुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं

विजय वडेट्टीवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी ओबीसी आरक्षणावरच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आरक्षण गेलं याला केंद्र सरकार कारणीभूत असल्याचा आरोप करत, 9 पत्रे पाठवूनही केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही, म्हणूनच ओबीसींचं आरक्षण गेल्याचं ते म्हणाले.

…तर ओबीसींचं आरक्षण टिकलं असतं!

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. राजकीय आरक्षण टिकलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. डाटा मिळवण्यासाठी आमच्यासह विरोधी पक्षानेही प्रयत्न केले पण केंद्राने तो डाटा दिला नाही. जर तो डेटा मिळाला असता तर ओबीसी आरक्षण टिकलं असतं, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. कपिल सिब्बल यांच्यामार्फत आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि आम्हाला डाटा देण्याची मागणी केली आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

संघर्षाशिवाय ओबीसी समाजाला काहीही मिळालं नाही

महाराष्ट्रातील ओबीसी आता आपल्या हक्कासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एकत्र येताना दिसत आहे, ही चांगली गोष्ट आहे. संघर्षाशिवाय ओबीसी समाजाला काहीही मिळालं नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

महाज्योतीसाठी 40 कोटी रुपये आम्हाला मिळाले आहेत. लवकरच औरंगाबादला महाज्योतिचे उपकेंद्र सुरु करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. महाज्योतीमधून यूपीएससीसाठी एक हजार मुलांना सिलेक्ट करण्याचं आम्ही ठरवलं आहे. महाज्योतीसाठी 15 दिवसांत जागेचा प्रश्न सोडवणार आहोत, अशी ग्वाहीदेखील वडेट्टीवार यांनी दिली.

((Maharashtra Minister Vijay Wadettiwar Allegation Modi GOVT Over OBC Reservation))

हे ही वाचा :

राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं आज नागपुरात अधिवेशन, ओबीसींची पुढची लढाई कशी, विचारमंथन होणार

ओबीसींच्या इम्पेरीकल डेटासाठी 435 कोटी द्या, अन्यथा झारीतील शुक्राचार्य कोण ते कळेल : चंद्रशेखर बावनकुळे

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....