AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार कधी पडणार, कोण पाडणार, भाजप नेत्यांनी दिलेल्या तारखांचं गणित काय? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत नुकतीच टीव्ही9 मराठी वर घेण्यात आली. त्यात त्यांनी सरकारच्या मागील दोन वर्षांतील कामकाजावर प्रतिक्रिया नोंदवली. तसेच सरकार पडण्याच्या चर्चांवरही सविस्तर उत्तर दिले.

सरकार कधी पडणार, कोण पाडणार, भाजप नेत्यांनी दिलेल्या तारखांचं गणित काय? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 2:32 PM
Share

मुंबईः भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)  सरकार मार्च महिन्यात पडेल असं वक्तव्य केलं, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच याआधीदेखील भाजपच्या नेत्यांनी अनेकदा सरकार कधी पडेल, याची भाकितं केली आहेत, त्याविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त टीव्ही 9 ला त्यांनी खास मुलाखत दिली.

राणेंनी सरकार पाडण्याची तारीख दिली, त्याचं काय?

भाजप नेते नारायण राणे यांनी येत्या मार्च महिन्यात सरकार पडेल, असं वक्तव्य केलंय, त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, नारायण राणेंनी हे विधान कोणत्या संदर्भाने केलंय, हे मी सांगू शकत नाही. किंवा चंद्रकांत पाटील यांनीही सरकार पडण्याविषयीचा अंदाज व्यक्त केला, त्याविषयीदेखील ते अधिक सांगू शकतील.

सरकारला पडण्याचीच धास्ती!

सरकार पडण्याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”या सरकारला पडण्याचीच खूप धास्ती आहे. त्यांना ही सत्ता म्हणजे 20-20 ची मॅच वाटते. कधी संपेल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी मागील दोन वर्षात जेवढं लुटता येईल, तेवढं लुटण्याचं काम केलं”

कधी पडणार सरकार, काय म्हणाले फडणवीस?

महाविकास आघाडी सरकार कधी पडणार या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ”हे महाविकास आघाडीचं सरकार अंतर्विरोधातूनच पडणार. आतापर्यंत राजकीय इतिहासच असा सांगतो. ज्या वेळेला असे सरकार येते, ते मजबूत स्थितीत वाटत असते, तेव्हा अतंर्गत विरोधातूनच ते सरकार पडते. त्यामुळे भाजप सरकार पाडणार नाही. तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अंतर्विरोधातूनच पडेल.”

इतर बातम्या-

सरकार आहे पण शासन नाही, केवळ बदल्यांची फॅक्टरी, कोरोना काळातले मृत्यू लपवले; फडणवीसांचा घणाघात

कोरोनाबाबत नवी नियमावली जाहीर; परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना सक्तीचे क्वारंटाईन

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.