AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरल्या म्हणून काय झाले, ममतादीदींना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार: संजय राऊत

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. (mamata banerjee can take oath as a chief minister, says sanjay raut)

हरल्या म्हणून काय झाले, ममतादीदींना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार: संजय राऊत
संजय राऊत, शिवसेना खासदार
| Updated on: May 05, 2021 | 10:24 AM
Share

मुंबई: तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, ममता बॅनर्जी निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. बंगालमध्ये विधान परिषद नाही, त्यामुळे त्या शपथ घेऊ शकत नाहीत, असं विरोधकांकडून सांगितल्या जात आहे. त्यावर हरल्या म्हणून काय झालं. ममता दीदींना बंगालच्या जनतेने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. (mamata banerjee can take oath as a chief minister, says sanjay raut)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. हा विजय केवळ आणि केवल त्यांचा आहे. त्यांच्या समोर बडे नेते होते. त्या सर्वांना त्यांनी भूईसपाट केलं आहे. त्यामुळे हा निव्वळ त्यांचा विजय असून आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

मोरारजी ते स्मृती ईराणींनी शपथ घेतली

यापूर्वी लोकसभेला पराभूत झालेल्यांना मंत्रिमंडळात शपथ देण्यात आली होती. स्मृती ईराणी, शिवराज पाटील यांनी शपथ घेतली होती. मोरारजी देसाई विधानसभेला पराभूत झाले होते. परंतु त्यांनीही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे या किरकोळ गोष्टी उभ्या करण्यात अर्थ नाही. ममता बॅनर्जी या नेत्या आहेत. त्या नंदीग्राममधून हरल्या असल्या तरी बंगालच्या जनतेने त्यांना स्वीकारलं आहे. त्यामुळे त्या शपथ घेऊ शकतात, असंही ते म्हणाले.

ममता राज्य नाही

बंगालमधील हिंसा चिंताजनक आहे. परंतु, तिथे सध्या ममता बॅनर्जी यांचं राज्य नाही. बंगालच्या जनतेने शांत राहावं. कोरोनाचं संकट आहे. या संकटाचा मुकाबला बंगालच्या जनतेने केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. (mamata banerjee can take oath as a chief minister, says sanjay raut)

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन, हितेंद्र ठाकूरांना भिडणाऱ्या बड्या नेत्याची काँग्रेसमध्ये घरवापसी

Coronavirus: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोनाचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

LIVE | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मुलांच्या जवळपास 6 कंपन्या सीबीआयच्या रडारवर

(mamata banerjee can take oath as a chief minister, says sanjay raut)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली