AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी पोहोचलो बेळगावात, तुम्ही का नाही? सीमेवर दिखावा करू नका, कोणत्या नेत्यानं दाखवून दिलं?

प्रत्येकाने अशा पद्धतीने आलो तरच हे आंदोलन यशस्वी होईल. कुणालातरी दाखवायचं म्हणून करत असाल तर ते चुकीचं आहे, अशी भूमिका या नेत्याने मांडली.

मी पोहोचलो बेळगावात, तुम्ही का नाही? सीमेवर दिखावा करू नका, कोणत्या नेत्यानं दाखवून दिलं?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 19, 2022 | 12:57 PM
Share

बेळगावः बेळगावात (Belgaum) जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची आज कर्नाटक सीमेवर धरपकड करण्यात आली. शेकडो मविआ कार्यकर्त्यांनी सीमेवर ठिय्या आंदोलन केलंय. मात्र ज्यांना बेळगावात जायचं, ते आमच्या पद्धतीने येऊ शकतात. उगाच सीमेवर देखावा करू नका, असं वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील (Dilip Patil) यांनी केलंय.

गनिमी कावा पद्धत वापरून ते आज बेळगावात दाखल झाले आहेत. तेथे टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. नेत्यांनी दिखावा करून येण्याऐवजी इथे लोकांच्या पाठिशी उभं राहणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.

सांगितलं ते करणारच, ही मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांसह आम्ही बेळगावात पोहोचलो आहोत. इथे दडपशाहीचं वातावरण आहे.

बेळगाव येथे आज महाराष्ट्र एकिकरण समितीचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ऐनवेळी हा मेळावा रद्द करून समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

भारतात फिरायला कुणीही बंदी घालू शकत नाही. कर्नाटक सरकारने सुरु केलेल्या दडपशाहीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. मराठी बांधवांच्या मागे मराठा क्रांती मोर्चा राहील, खांद्याला खांदा लावून आम्ही लढू, असं आश्वासन दिलीप पाटील यांनी दिलं.

महाविकास आघाडीने मोठी रॅली काढत बेळगावात येण्याचं नाट्य केलं. पण त्यांना यायचंच होतं तर आम्ही आलो त्या पद्धतीने का नाही आले? कोगनोळीपर्यंत येतात, रॅली करतात, शो करतात आणि निघून जातात…

प्रत्येकाने अशा पद्धतीने आलो तरच हे आंदोलन यशस्वी होईल. कुणालातरी दाखवायचं म्हणून करत असाल तर ते चुकीचं आहे, अशी भूमिका दिलीप पाटील यांनी मांडली.

दोन्ही राज्यातील जनतेला परस्परांच्या राज्यात येण्यास अडवणूक करू नये, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं असतानाही कर्नाटकचे सरकार मुजोरी सोडायला तयार नाही. म्हणजेच हे सरकार कायदा, संविधान मानत नाही, हाच अर्थ असल्याचा आरोप दिलीप पाटील यांनी केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.