AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजप-सेनेला पाठिंबा

मुंबई: मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्र क्रांती सेनेने उभे केलेले 15 उमेदवारही मागे घेतले आहेत. महाराष्ट्र क्रांती सेनेचे प्रमुख सुरेश पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. हा पक्ष आता महायुतीचा घटक पक्ष असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र क्रांती सेनेला […]

मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजप-सेनेला पाठिंबा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

मुंबई: मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्र क्रांती सेनेने उभे केलेले 15 उमेदवारही मागे घेतले आहेत. महाराष्ट्र क्रांती सेनेचे प्रमुख सुरेश पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. हा पक्ष आता महायुतीचा घटक पक्ष असेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र क्रांती सेनेला घटक पक्ष म्हणून मान्यता दिली. शिवाय मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याची हमी दिल्याचा दावा महाराष्ट्र क्रांती सेनेने केला. यावेळी महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील, भाजप नेते विनोद तावडे आणि शिवसेना नेते दिवाकर रावते उपस्थित होते.

गेल्या वर्षी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरेश पाटील यांनी अनेक मराठा संघटनांचा विरोध डावलून, महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची स्थापना केली होती. रायरेश्वर गडावर या पक्षाची घोषणा करण्यात आली होती.  या पक्षाकडून विद्यमान सरकारविरोधात लोकसभा निवडणुकीत 15 उमेदवारही जाहीर करण्यात आले होते. मात्र आता ते सर्व उमेदवार मागे घेण्यात आले आहेत.

मुंबईत रविवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीत महाराष्ट्र क्रांती सेनेने भाजप-शिवसेना युतीसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. “आम्हाला आमच्या आरक्षणासाठी मदत करणाऱ्या सरकारला पाठिंबा दिला आहे. गरज पडल्यास समाजासोबत सरकारच्याविरोधात जाण्यासही तयार असेल”, असं सुरेश पाटील यांनी सांगितलं.

यावेळी विनोद तावडे म्हणाले, “आज महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीत सहभागी झाली. महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी काहीतरी ठोस करण्यासाठी आम्हाला शक्ती  मिळाली आहे. मराठा समाजाला मिळवून दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या कसोटीतील आहे. त्यामुळे यापुढेही ते टिकेल. आमचा शब्द फिरणार नाही. जो शब्द दिलाय तो कायम राहील”.

दरम्यान,  मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र क्रांती समाजाला  ग्वाही देणारं एक पत्र दिलं. ते विनोद तावडे आणि दिवाकर रावते यांनी वाचून दाखवलं. मराठा समाजाला कायम पाठिंबा असेल, असं या पत्रात नमूद करण्यात आलं.

संबंधित बातम्या

मराठ्यांची क्रांती सेना 47 जागा लढवणार, फक्त ‘ही’ जागा सोडली!  

मराठा मोर्चाचा पक्ष स्थापन, नाव ठेवलं…!    

मराठा आरक्षणावरील विनोद पाटलांची याचिका अखेर निकाली!  

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.