AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagatsingh Koshyari | मुंबई आणि महाराष्ट्राचा संताप, अखेर राज्यपालांकडून ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा, काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी

काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही. कालच्या त्यांच्या विधनानंतर हा त्यांनी खुलासा केला आहे.

Bhagatsingh Koshyari | मुंबई आणि महाराष्ट्राचा संताप, अखेर राज्यपालांकडून 'त्या' वक्तव्याचा खुलासा, काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी
बहुमत चाचणीचा आदेश देऊन राज्यपाल कोश्यारींनी घटनेचा भंग केला?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2022 | 12:45 PM
Share

 मुंबई : अंधेरी मुंबई शुक्रवारी चौकाच्या नामकरणाच्या वेळी (Governor Bhagatsingh Koshyari) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या भाषणासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या (Mumbai) मुंबईबद्दलच्या विधानाने चोहिबाजूने टिकेची झोड उडाली होती. त्यानंतर त्यांनी आपला खुलासा दिला असून यामध्ये “मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत (Governor) राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या खुलाश्यानंतर आता विरोधक काय म्हणतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

अंधेरी मुंबईतील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईचे महत्व कशामुळे टिकवून आहे हे सांगितले. मुंबईतून गुजरात आणि बिहारचे नागरिक निघून गेले तर काय उरणार..? यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीचे महत्व कसे टिकणार? इतर राज्यातील नागरिकांमुळेच मुंबईला महत्व असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर विरोधकांकडून यावर विधानाला घेऊन जोरदार टिका केली आहे. तर राज्यपाल यांनी त्यांचे काम करावे, मुंबईमध्ये नाक खूपसू नये असे मनसेच्या वतीने सुनावण्यात आले होते. टिकेची झोड होताच त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

काय आहे खुलासा?

काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही. कालच्या त्यांच्या विधनानंतर हा त्यांनी खुलासा केला आहे.

विरोधकांकडून खरपूस समाचार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर सडकून टिका केली जात आहे. केवळ विरोधकच नाहीतर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी देखील याबाबत मुख्यमंत्री हे पंतप्रधानांना बोलणार आहेत. शिवाय त्यांचे वक्तव्य हे बरोबर नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे सोशल मिडियामध्येही कोश्यारी यांना टार्गेट केले जात आहे. आता त्यांनी केलेल्या खुलाश्यानंतर विरोधक काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.