संभाजीनगर नावावरुन राज्यात चर्चा, तीन पक्ष मिळून तोडगा काढू : गुलाबराव पाटील

संभाजीनगर नाव देणं हे काही चुकीचं नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. (Minister Gulabrao Patil On Aurangabad Rename) 

संभाजीनगर नावावरुन राज्यात चर्चा, तीन पक्ष मिळून तोडगा काढू  : गुलाबराव पाटील
Gulabrao Patil
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 8:52 PM

जळगाव : औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं ही पूर्वीपासूनच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ती आजची घोषणा नाही. कोणत्याही शिवसैनिकांनी औरंगाबाद नावं कधीच घेतलं नाही तर संभाजीनगर आलं आहे. संभाजीनगर नाव देणं हे काही चुकीचं नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. (Minister Gulabrao Patil On Aurangabad Rename)

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे नामांतर करण्यावरुन राजकारण सुरु आहे. त्यावर सत्ताधाऱ्यांसह अनेक विरोधी पक्षांकडून टीका टिप्पणी सुरु आहे. त्यावर नुकतंच मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं ही पूर्वीपासूनच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ती आजची घोषणा नाही. कोणत्याही शिवसैनिकांनी औरंगाबाद नाव कधीच घेतलं नाही तर संभाजीनगर आलं आहे. संभाजीनगर नाव देणं हे काही चुकीचं नाही. संभाजीनगरच्या नावावरुन राज्यात चर्चा होत आहे. तरी या विषयावर तीन पक्ष तोडगा काढणार आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

हिंदूत्व कोणाच बदललं आणि कोणाचा बदललं नाही हे कोणाच्या सांगण्यावरुन सिद्ध होत नाही. शिवसेनेचा जन्मच हिंदूत्वापासून झालेला आहे. शिवसेना जेव्हा राज्यात आली तेव्हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आली, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

शिवसेना हा हिंदुत्वाच्या मुद्यावर आमदारकी गमावलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिला आमदार विलेपार्लेमधून निवडून आला. त्यांची निवडणूक फक्त हिंदुत्वाच्या मुद्यावर रद्द झाली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विसरू नये, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. (Minister Gulabrao Patil On Aurangabad Rename)

संबंधित बातम्या : 

काल भाजप सदस्यांचा धनंजय मुंडेंना पाठिंबा, आज पंकजांची बोचरी टीका

उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.