AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best Election Result : ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा धुव्वा, बेस्ट पतपेढीत थेट भोपळा; नेमक्या काय चुका भोवल्या?

निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे म्हटले जात होते. या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले पण त्यांचा पराभव झाला. दरम्यान, आता या निवडणुकीत ठाकरे नावाचा ब्रँड का चालला नाही, याची नेमकी कारणं समोर आली आहेत.

Best Election Result : ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा धुव्वा, बेस्ट पतपेढीत थेट भोपळा; नेमक्या काय चुका भोवल्या?
uddhav thackeray and raj thackeray
| Updated on: Aug 20, 2025 | 3:55 PM
Share

Best Society Election Result : गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी युती केली होती. दोन्ही भावांचं उत्सर्ष पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात उतरलं होतं. दरम्यान, या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे म्हटले जात होते. या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले पण त्यांचा पराभव झाला. दरम्यान, आता या निवडणुकीत ठाकरे नावाचा ब्रँड का चालला नाही, याची नेमकी कारणं समोर आली आहेत.

वरिष्ठ नेत्यांचे निवडणुकीकडे दुर्लक्ष

बेस्टच्या पतपेढी निवडणुकीकडे आगामी पालिका निवडणुकीसाठी चाचणी परीक्षा म्हणून पाहिले जात होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास नेमका काय चमत्कार होऊ शकतो? हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र निकालानंतर ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनेल पराभूत झाल्याचे समोर आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ठाकर गटच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीत प्रचार केला नाही.

महापालिकेत शिवसेना (संयुक्त शिवसेना) अडीच दशके सत्तेत होती. मात्र सत्तेत असूनही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. हीच बाब आता ठाकरे गटाला भोवल्याचे म्हटले जात आहे. कामगार मदत करतील आणि ठाकरे ब्रँण्डचा प्रभाव मतदारांवर पडेल, असे ठाकरे गट आणि मनसेने ग्रहित धरले. त्याचा परिणाम निकालावर झाला. आणखी एक बाब म्हणजे उत्कर्ष पॅनेललने दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी काही उमेदवारावरून ठाकरेंच्या शिवसेनेतच मतभेद होते. हा विसंवाद पतपेढी निवडणुकीत भोवला.

ऐन निवडणुकीत झाले भ्रष्टाचाराचे आरोप

या निवडणुकीत मनसेचे काही वरिष्ठ नेते या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते. मात्र ठाकरेंच्या पक्षाचा एकही वरिष्ठ नेता या निवडणुकीच्या प्रचारात दिसला नाही. ऐन निवडणुकीच्या काळात जुन्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यानंतर या आरोपांची चौकशीही चालू झाली. त्याचा थेट परिणाम मतदानावर पडला. परिणामी ठाकरे-मनसेच्या पॅनेलचा पराभव झाला.

निवडणुकीचा निकाल काय लागला?

बेस्ट पतपेढीच्या निकालात ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही. शशांक राव यांच्या पॅनेलने एकूण 14 जागा जिंकल्या आहेत. तर प्रसाद लाड यांच्या पॅनेलचे एकूण सात उमेदवार विजयी झाले आहेत.

Follow Us
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.