AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best Election Result : ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा धुव्वा, बेस्ट पतपेढीत थेट भोपळा; नेमक्या काय चुका भोवल्या?

निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे म्हटले जात होते. या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले पण त्यांचा पराभव झाला. दरम्यान, आता या निवडणुकीत ठाकरे नावाचा ब्रँड का चालला नाही, याची नेमकी कारणं समोर आली आहेत.

Best Election Result : ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा धुव्वा, बेस्ट पतपेढीत थेट भोपळा; नेमक्या काय चुका भोवल्या?
uddhav thackeray and raj thackeray
| Updated on: Aug 20, 2025 | 3:55 PM
Share

Best Society Election Result : गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी युती केली होती. दोन्ही भावांचं उत्सर्ष पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात उतरलं होतं. दरम्यान, या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे म्हटले जात होते. या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले पण त्यांचा पराभव झाला. दरम्यान, आता या निवडणुकीत ठाकरे नावाचा ब्रँड का चालला नाही, याची नेमकी कारणं समोर आली आहेत.

वरिष्ठ नेत्यांचे निवडणुकीकडे दुर्लक्ष

बेस्टच्या पतपेढी निवडणुकीकडे आगामी पालिका निवडणुकीसाठी चाचणी परीक्षा म्हणून पाहिले जात होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास नेमका काय चमत्कार होऊ शकतो? हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र निकालानंतर ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनेल पराभूत झाल्याचे समोर आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ठाकर गटच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीत प्रचार केला नाही.

महापालिकेत शिवसेना (संयुक्त शिवसेना) अडीच दशके सत्तेत होती. मात्र सत्तेत असूनही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. हीच बाब आता ठाकरे गटाला भोवल्याचे म्हटले जात आहे. कामगार मदत करतील आणि ठाकरे ब्रँण्डचा प्रभाव मतदारांवर पडेल, असे ठाकरे गट आणि मनसेने ग्रहित धरले. त्याचा परिणाम निकालावर झाला. आणखी एक बाब म्हणजे उत्कर्ष पॅनेललने दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी काही उमेदवारावरून ठाकरेंच्या शिवसेनेतच मतभेद होते. हा विसंवाद पतपेढी निवडणुकीत भोवला.

ऐन निवडणुकीत झाले भ्रष्टाचाराचे आरोप

या निवडणुकीत मनसेचे काही वरिष्ठ नेते या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते. मात्र ठाकरेंच्या पक्षाचा एकही वरिष्ठ नेता या निवडणुकीच्या प्रचारात दिसला नाही. ऐन निवडणुकीच्या काळात जुन्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यानंतर या आरोपांची चौकशीही चालू झाली. त्याचा थेट परिणाम मतदानावर पडला. परिणामी ठाकरे-मनसेच्या पॅनेलचा पराभव झाला.

निवडणुकीचा निकाल काय लागला?

बेस्ट पतपेढीच्या निकालात ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही. शशांक राव यांच्या पॅनेलने एकूण 14 जागा जिंकल्या आहेत. तर प्रसाद लाड यांच्या पॅनेलचे एकूण सात उमेदवार विजयी झाले आहेत.

Follow Us
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...
रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी