AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर…; बच्चू कडू यांनी भाजपला ‘त्या’ घटनेची आठवण करून दिली

Bacchu Kadu on Anil Bonde : फडणवीस आणि शिंदे यांची तुलना कधीच होऊ शकत नाही, कारण...; बच्चू कडू यांनी सुनावलं

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर...; बच्चू कडू यांनी भाजपला 'त्या' घटनेची आठवण करून दिली
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 15, 2023 | 11:42 AM
Share

मुंबई : मुंबईच्या बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींची आमदार बच्चू कडू यांनी भेट घेतली. आदिवासींची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन आदिवासींच्या मूलभूत सुविधा आणि पुनर्वसन याबाबत चर्चा केली. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी भाजप आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आठवण करून दिली आहे.

देशात नरेंद्र मोदी तर राज्यात एकनाथ शिंदे अशी जाहिरात वर्तमान पत्रात झळकली.  बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, असं उदाहरण देत अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर टीका केली आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनिल बोंडेला माहित नाही की आज आपल्याला जो आदर आहे कशामुळे आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केला नसता तर हे सगळं घडलं असतं का? अनिल बोंडेंना समजावून सांगितलं पाहिजे की, या संपूर्ण प्रकरणात भोंडे यांच्या बोलण्यामुळे पक्ष आणि सरकार दोन्हीमध्ये अडचण निर्माण झाली आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. अजित पवार आणि शरद पवार यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र आणि रावणाची तुलना होऊ शकत नाही, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कधीच होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा विषय आहे. प्रत्येकाची प्रतिष्ठा वेगळी आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.

उल्हासनगरमधील भाजपच्या पोस्टरवरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही कोणाचेही बॅनर लावू शकतो. काहीही लिहू शकतो. त्या बॅनरला काही अर्थ आहे का? त्या बॅनरला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं ते म्हणालेत.

बच्चू कडू यांनी आदिवासी प्रश्नांवरही प्रतिक्रिया दिली आहे. आदिवासी पाड्यात पाण्याची लाईन नाही. मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. राष्ट्रीय उद्यानाच्या नावाखाली ही सुविधा बंद केली आहे. आज मी अधिकाऱ्यांशी बोललो. सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही बोललो. उच्च न्यायालयाच्या निर्णयात मुलभूत सुविधा देता येत नाहीत, हे चुकीचे आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...