AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayant Patil : पुतळा उभारण्यासाठी जयदीप आपटेला किती लाख रुपये मिळाले? जयंत पाटील यांनी सांगितला आकडा

Jayant Patil : "आमची माफी मागा ही मागणी नव्हतीच. हा भ्रष्टाचार झालेला आहे. महाराजांचा पुतळा कोसळला. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. त्याचं प्रायश्चित सरकारने घेतलं पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. आता हे माफी मागत फिरत आहेत. पण महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही"

Jayant Patil : पुतळा उभारण्यासाठी जयदीप आपटेला किती लाख रुपये मिळाले? जयंत पाटील यांनी सांगितला आकडा
Jayant Patil
| Updated on: Sep 06, 2024 | 1:38 PM
Share

“शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने हे सरकार प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करतंय हे सिद्ध झालंय. रस्ते, पूल आणि सर्व मोठ्या प्रकल्पात भ्रष्टाचार होत आहे. मालवणमध्ये पुतळा झाला. शिल्पकाराचा अनुभव नव्हता तरीही त्याला पैसे दिले. त्याला फक्त 26 लाख मिळाले. बाकीचे पैसे कुठे गेले? त्याची चौकशी झाली पाहिजे. आपटे सामान्य माणूस असेल. तोही पोलिसांपासून लपू शकतो. पोलिसांना चकवा देऊ शकतो. तो सराईत गुन्हेगार नाही” असं जयंत पाटील म्हणाले. TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात ते बोलत होते.

“कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली असेल. ढासळली म्हणणं चुकीचं ठरेल. ती शून्य झाली. बदलापूरची घटना पाहा. नागपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जुगार खेळत होते. वचक राहिला नाही. सरकारने नैतिकता गमावली आहे. सर्व विभागात पोस्टिंग देताना कशी होते ते जगजाहीर आहे. त्यामुळे नैतिकता राहिली नाही. पारदर्शकता नाही. धमकी दिली जात आहे. अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत” असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

‘महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला’

“आमची माफी मागा ही मागणी नव्हतीच. हा भ्रष्टाचार झालेला आहे. महाराजांचा पुतळा कोसळला. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. त्याचं प्रायश्चित सरकारने घेतलं पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. आता हे माफी मागत फिरत आहेत. पण महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही” असा दावा जयंत पाटील यांनी केला.

‘माफी मागावी ही आमची कधीच मागणी नव्हती’

“राज्यातील जनता सर्व गोष्टी सहन करेल, पण महाराजांचा पुतळा पडणं कधीच सहन करणार नाही. त्यातील भ्रष्टाचार कधीच खपवून घेणार नाही. राज्यातील जनता त्यांना कधीच माफी देणार नाही. माफी मागावी ही आमची कधीच मागणी नव्हती. कारण महाराष्ट्र यांना ऐकणार नाही. हे त्यांना समजलं आहे. त्यामुळे माफी मागत फिरत आहेत. पण जनता त्यांना माफी देणार नाही” असं जयंत पाटील म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.