AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole | …तर नवाब मलिक यांना खूर्चीवर राहण्याचा अधिकार नाही : नाना पटोले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या ईडी कोठडीत आहेत.

Nana Patole | ...तर नवाब मलिक यांना खूर्चीवर राहण्याचा अधिकार नाही : नाना पटोले
नाना पटोले नेमकं काय म्हणालेImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Mar 03, 2022 | 6:25 PM
Share

मुंबई : आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या ईडी कोठडीत आहेत. त्यामुळं त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजप आक्रमक झाला आहे. भाजपच्यावतीनं विधिमंडळाबाहेर आणि सभागृहात आक्रमक आंदोलन केलं आहे. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपच्या मागणीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांच्या प्रकरणात सध्या आरोप आहेत. नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, याच्याशी आम्ही सहमत आहोत, असं नाना पटोले म्हणाले. याशिवाय इकबाल मिर्चीकडून भाजपला डोनेशन मिळाल असून भाजप पक्ष विसर्जित करणार का, असा सवाल नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले काय म्हणाले?

नवाब मलिकांच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत. कोर्टानं अगर ते सिद्ध झालं तर निश्चितपणे त्यांना मंत्रिमडळात राहण्याचा अधिकार नाही याच्याशी सहमत आहे. पण, जे काही वर्तन भाजपचं महाराष्ट्रात पाहतोय. कोणावरही आरोप करायचं, दुषित करायचं त्याची बदनामी करायची, हे भाजपकडून राजकारण सुरु आहे त्यावर विश्वास कोण ठेवणार असं नाना पटोले म्हणाले.

कोर्टाचा एकदा निर्णय येऊ द्या, नवाब मलिकांचा समजा दाऊदशी संबंध असल्यास त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. पण, तमच्या पक्षाचा आर्थिक व्यवहारामध्ये इकबाल मिर्चीशी संबंध आहे तर तुमचा पक्षचं विसर्जित करणार का सवाल असल्याचं नाना पटोले म्हणाले.

पाहा व्हिडीओ:

राजीनामा मागण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही

नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा नैतिक अधिकार भाजपला नसल्याचं प्रत्युत्तर महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. 20 कोटी रुपये कुणाकडून घेतले होते. इकबाल मिर्चीकडून भाजपनं 20 कोटी घेतले होते, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

इतर बातम्या :

आरक्षणाच्या मुद्यावर चारही पक्षांकडून फसवणूक,देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी रडण्याचं नाटक करु नये : प्रकाश आंबेडकर

छत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पुणेकरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य होणं आवश्यक अन्यथा….; राष्ट्रवादी काँग्रेसने दिला हा इशारा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली