AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कृष्णकुंजवर, मंदिर उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? राज ठाकरेंचा सवाल

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट (Trimbakeshwar Temple trustee meet Raj Thackeray) घेतली.

त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कृष्णकुंजवर, मंदिर उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? राज ठाकरेंचा सवाल
| Updated on: Aug 17, 2020 | 4:33 PM
Share

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. ही मंदिर पुन्हा खुली करण्यास सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी “मंदिर पुन्हा सुरु करावी, अशी विनंती सरकार दरबारी करा,” अशी मागणी त्यांनी राज ठाकरेंकडे केली. “मॉल उघडले तर मंदिर का नाहीत?” असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. (Trimbakeshwar Temple trustee meet Raj Thackeray)

याबाबतचा एक व्हिडीओ मनसेच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यात राज ठाकरे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांशी चर्चा करताना दिसत आहे. यावेळी राज ठाकरेंनी “धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? असा प्रश्न विचारला. तसेच त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत? असेही राज ठाकरेंनी सांगितले.

“हा एका मंदिराचा विषय नाही. सर्व मंदिरांचा आहे. मंदिर खुली झाली पाहिजे. पण त्याबाबत तुम्ही काय काळजी घेणार. मंदिर प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय उपाययोजना करणार हे सर्वात आधी ठरवलं पाहिजे. जर एकदम गर्दी झाली तर गोंधळ होईल, असे राज ठाकरे म्हणाले.

याबाबत त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त प्रशांत गायदने यांना विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरेंशी त्र्यंबकेश्वरमध्ये होणारे धार्मिक विधी आणि त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिलिंगाचे मंदिर हे उघडणे यावर विस्तृत चर्चा केली. यावर राज ठाकरेंनी यावर काही नियमावली काढता येईल का? जर मॉल्स महाराष्ट्रात उघडले तर मंदिर उघडली पाहिजेत या भूमिकेशी राज ठाकरे सहमत आहेत.

मात्र जर मोठ्या संख्येने भाविक आले तर आपण काय करणार त्याबाबतचे नियोजन काय, असे राज ठाकरेंनी विचारले. यासाठी शासनस्तरावर एखादी नियमावली जाहीर करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. (Trimbakeshwar Temple trustee meet Raj Thackeray)

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांचा नकार, मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला

हम बहुत छोटे लोग, हेलिकॉप्टरसे आते नही, 79 व्या वर्षी कोश्यारींनी पायीच शिवनेरी केला सर

Follow Us
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.