AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता तुम्ही हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलात; नवाब मलिकांचा फडणवीसांवर घणाघात

राज्य सरकार योग्य फॉरमॅटमध्ये केंद्राकडे मदत मागत नसल्याचं वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आता तुम्ही हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलात; नवाब मलिकांचा फडणवीसांवर घणाघात
| Updated on: Oct 23, 2020 | 10:00 PM
Share

परभणी : राज्य सरकार योग्य फॉरमॅटमध्ये केंद्राकडे मदत मागत नसल्याचं वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्याबद्दल अधिकारच उरलेला नाही, असा टोला मलिक यांनी लगावला आहे. (Nawab malik slams devendra fadnavis over Farmers help package)

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक सध्या जिल्ह्याच्या वर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना राज्याबद्दल बोलण्याचा अधिकारच उरला नाहीये.

देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते असताना बिहारमध्ये जाऊन म्हणतायत की, ‘बिहारवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रेम आहे’. ते महाराष्ट्राबाबत दुजाभाव करतात. आता ती वेळ राहिली नाही. हाफचड्डी घालून एका गावात एक बोलायचं आणि दुसऱ्या गावात एक बोलायचं, असं चालणार नाही. आता तुम्ही हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलात, असा घणाघात मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, मलिक यांनी आज सेलू मानवत तालुक्यातील चार ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर त्यानी कोरोनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केलं.

मलिक म्हणाले की, एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्याने पक्षाला त्याचा फायदाच होणार आहे. ते कोणतीही अभिलाषा ठेऊन पक्षात आलेले नाहीत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार जी काही जबाबदारी त्यांच्यावर सोपवतील ती जबाबदारी निभावण्यासाठी खडसे तयार आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत बोलताना मलिक म्हणाले की, केंद्र सरकार राज्याला जीएसटी देत नाहीये, एनडीआरएफनुसार राज्याला मदत ही करीत नाहीये. 10 हजार कोटी रुपयांची मदत द्यायला राज्य सरकारकडे पैसे नाहीत, पण तितकी मदत देण्याची आमची इच्छा आहे. यासाठी सरकारला कर्ज काढावं लागेल.

संबंधित बातम्या

खडसेंनंतर भाजपला मीरा-भाईंदरमध्येही मोठ्या झटक्याची शक्यता, बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

आज मन हलकं झालं, नाही तर मी गेलोच होतो; एकनाथ खडसे भावूक

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच चंद्रकांतदादांची टीका; खडसे-पाटील जुंपली

(Nawab malik slams devendra fadnavis over Farmers help package)

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.