AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांनी माघार घेऊन त्यांचा जनाधार कमी झाल्याचे संकेत दिलेत : प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आपले 37 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतवरले असून इतर ठिकाणचे उमेदवार येत्या दोन-तीन दिवसात जाहीर केले जातील, असं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे यंदाची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक तिरंगी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला नुकसान होईल असं बोललं जात असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा खोडून काढत भाजप आणि […]

पवारांनी माघार घेऊन त्यांचा जनाधार कमी झाल्याचे संकेत दिलेत : प्रकाश आंबेडकर
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आपले 37 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतवरले असून इतर ठिकाणचे उमेदवार येत्या दोन-तीन दिवसात जाहीर केले जातील, असं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे यंदाची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक तिरंगी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला नुकसान होईल असं बोललं जात असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा खोडून काढत भाजप आणि शिवसेनेला याचा तोटा होणार असल्याचं म्हटलंय.

दरम्यान, काँग्रेसने नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले यांना मैदानात उतरवून मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय. नागपुरात नाना पटोलेंना पाठिंबा नाही, असंही प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं. प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंविरोधात लढणार असल्याचं बोललं जातंय. सुशील कुमार शिंदे हे वंचित नसून ते सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आहे. शरद पवारांनी माघार घेऊन त्यांचा जनाधार कमी झाल्याचे संकेत दिलेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. शिवाय राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मावळमधून राष्ट्रवादीने शरद पवारांचे नातू पार्थ पवारांना उमेदवारी दिली आहे. यावरुनही त्यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवार नातवांचं राजकारण करतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे घराणेशाही चालवतात, पक्ष नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आघाडीवर निशाणा साधला. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे यांची घराणेशाही स्पष्ट झाली असल्याचंही ते म्हणाले.

वाचा – वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.