AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांनी माघार घेऊन त्यांचा जनाधार कमी झाल्याचे संकेत दिलेत : प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आपले 37 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतवरले असून इतर ठिकाणचे उमेदवार येत्या दोन-तीन दिवसात जाहीर केले जातील, असं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे यंदाची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक तिरंगी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला नुकसान होईल असं बोललं जात असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा खोडून काढत भाजप आणि […]

पवारांनी माघार घेऊन त्यांचा जनाधार कमी झाल्याचे संकेत दिलेत : प्रकाश आंबेडकर
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आपले 37 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतवरले असून इतर ठिकाणचे उमेदवार येत्या दोन-तीन दिवसात जाहीर केले जातील, असं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे यंदाची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक तिरंगी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला नुकसान होईल असं बोललं जात असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा खोडून काढत भाजप आणि शिवसेनेला याचा तोटा होणार असल्याचं म्हटलंय.

दरम्यान, काँग्रेसने नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले यांना मैदानात उतरवून मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय. नागपुरात नाना पटोलेंना पाठिंबा नाही, असंही प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं. प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंविरोधात लढणार असल्याचं बोललं जातंय. सुशील कुमार शिंदे हे वंचित नसून ते सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आहे. शरद पवारांनी माघार घेऊन त्यांचा जनाधार कमी झाल्याचे संकेत दिलेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. शिवाय राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मावळमधून राष्ट्रवादीने शरद पवारांचे नातू पार्थ पवारांना उमेदवारी दिली आहे. यावरुनही त्यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवार नातवांचं राजकारण करतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे घराणेशाही चालवतात, पक्ष नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आघाडीवर निशाणा साधला. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे यांची घराणेशाही स्पष्ट झाली असल्याचंही ते म्हणाले.

वाचा – वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.