AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांनी माघार घेऊन त्यांचा जनाधार कमी झाल्याचे संकेत दिलेत : प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आपले 37 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतवरले असून इतर ठिकाणचे उमेदवार येत्या दोन-तीन दिवसात जाहीर केले जातील, असं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे यंदाची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक तिरंगी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला नुकसान होईल असं बोललं जात असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा खोडून काढत भाजप आणि […]

पवारांनी माघार घेऊन त्यांचा जनाधार कमी झाल्याचे संकेत दिलेत : प्रकाश आंबेडकर
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आपले 37 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतवरले असून इतर ठिकाणचे उमेदवार येत्या दोन-तीन दिवसात जाहीर केले जातील, असं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे यंदाची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक तिरंगी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला नुकसान होईल असं बोललं जात असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा खोडून काढत भाजप आणि शिवसेनेला याचा तोटा होणार असल्याचं म्हटलंय.

दरम्यान, काँग्रेसने नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले यांना मैदानात उतरवून मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय. नागपुरात नाना पटोलेंना पाठिंबा नाही, असंही प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं. प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंविरोधात लढणार असल्याचं बोललं जातंय. सुशील कुमार शिंदे हे वंचित नसून ते सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आहे. शरद पवारांनी माघार घेऊन त्यांचा जनाधार कमी झाल्याचे संकेत दिलेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. शिवाय राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मावळमधून राष्ट्रवादीने शरद पवारांचे नातू पार्थ पवारांना उमेदवारी दिली आहे. यावरुनही त्यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवार नातवांचं राजकारण करतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे घराणेशाही चालवतात, पक्ष नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आघाडीवर निशाणा साधला. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे यांची घराणेशाही स्पष्ट झाली असल्याचंही ते म्हणाले.

वाचा – वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.