AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ : निलेश राणे

माजी खासदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला (Nilesh Rane slams Maha Vikas Aghadi over Minister Sanjay Rathore).

संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ : निलेश राणे
निलेश राणे, माजी खासदार
| Updated on: Feb 23, 2021 | 4:30 PM
Share

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यांनी आज (23 फेब्रुवारी) यवतमाळमधील पोहरादेवी गडावर जावून जगदंबामातेचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या शेकडो समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. याच मुद्द्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे (Nilesh Rane slams Maha Vikas Aghadi over Minister Sanjay Rathore).

निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

“शिवजयंतीला शिवनेरीवर 144 कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले. त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे”, असा घणाघात निलेश राणे यांनी केला (Nilesh Rane slams Maha Vikas Aghadi over Minister Sanjay Rathore).

पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राठोड यांची नेमकी प्रतिक्रिया काय?

जवळपास 15 दिवसानंतर संजय राठोड आज माध्यमांसमोर आले. पोहोरादेवीगडावर सर्व समाध्यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दहा ते बारा मिनिटे एवढीच चालली. पण पत्रकार परिषदेची सुरुवातच त्यांनी पूजा चव्हाणचं नाव घेऊन केली. ते म्हणाले, पूजा चव्हाण ही आमच्या गोर बंजारा समाजातील तरुणी होती आणि तिचा पुण्यात अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचं आमच्या गोर बंजारा समाजाला अत्यंत दु;ख झालं आहे. चव्हाण कुटुंबाच्या दु:खात मी आणि आमचा सर्व समाज सहभागी आहे. यानंतर मात्र त्यांनी पूजाचं पुढे कुठेही नाव घेतलं नाही.

काय आहे पूजा चव्हाण-संजय राठोड-अरुण राठोड कनेक्शन?

पूजा चव्हाण ह्या तरुणीनं काही दिवसांपुर्वी पुण्यात आत्महत्या केली. ती मुळची परळीची. तिच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचा आवाज असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. संजय राठोड यांच्यासोबतच्या संबंधांमुळेच पूजानं आत्महत्या केल्याचा आरोपही विरोधी पक्षानं केला आहे. त्याच क्लीपमध्ये अरुण राठोडचा आवाजही असल्याचं सांगितलं जात आहे. तो पूजाचा मित्र असून संजय राठोडसाठी काम करत असल्याचं बोललं जातं आहे.

संबंधित बातम्या :

मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?, आशिष शेलार यांचा सवाल

संजय राठोडांनी जी भूमिका मांडली, तीच आम्हीही सांगतोय, तपास योग्य पद्धतीने : नाना पटोले

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.