AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking : ‘शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा डाव होता’, नितेश राणेंचा गंभीर आरोप; ‘कलानगर’चाही उल्लेख!

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलाय. शरीरात चुकीचं औषध टाकून मला मारण्याचा कट होता. त्यांना सर्व विरोधकांनाही असंच संपवायचं आहे, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केलाय.

Breaking : 'शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा डाव होता', नितेश राणेंचा गंभीर आरोप; 'कलानगर'चाही उल्लेख!
नितेश राणे यांचा विधानसभेत सनसनाटी आरोपImage Credit source: TV9 Marathi
sagar joshi
sagar joshi | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Mar 24, 2022 | 10:14 PM
Share

मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) गंभीर आरोप केलाय. शरीरात चुकीचं औषध टाकून मला मारण्याचा कट होता. त्यांना सर्व विरोधकांनाही असंच संपवायचं आहे, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केलाय. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Attack Case) नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे, तसंच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे आपल्याला मारण्याचा सरकारचा डाव होता, असा आरोप करत राणेंनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिलीय.

नितेश राणेंचा नेमका आरोप काय?

नितेश राणे यांनी संतोष परब हल्ला प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोप केलाय. नितेश राणे म्हणाले की, ‘या प्रकरणात मला पोलिसांचा, प्रशासनाला आलेला अनुभव थक्क करणारा आहे. एक लोकप्रतिनिधी, एका आमदारासोबत कोणत्या पद्धतीने वागले, ते प्रकरण कशा पद्धतीनं हाताळलं गेलं, त्याचा विचार या सभागृहानं करण्याची गरज आहे. डॉक्टर, पोलीस अधिकारी किंवा कोर्ट परिसरातील एसपींचा वावर असो. या सभागृहानिमित्तानं फार महत्वाची माहिती मला गृहमंत्र्यांना द्यायची आहे. कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयात मला दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर माझ्याकडे आले आणि मला आग्रह करु लागले की तुम्हाला सीटी एनजीओ करावा लागेल. मी म्हटलं मला आता तसं काही वाटत नाही. माझा बीपी आणि सर्व गोष्टी लो होत्या ते मला कळत होत्या. पण नाही नाही तुम्हाला सीटी-एनजीओ करावा लागेल. आता सगळेच काही सरकारच्या बाजूने नसतात, काही आमच्याही ओळखीचे आहेत. काही कर्मचाऱ्यांनी मला येऊन सांगितलं की साहेब हे सीटी-एनजीओ करु नका. कारण, त्यासाठी इंक तुमच्या शरीरात टाकावी लागते आणि ती इंक टाकून तुम्हाला मारण्याचा डाव आहे. मारुन टाकण्याचा डाव आहे, कुठल्याही परिस्थितीत नितेशजी होकार देऊ नका, हे तिथल्या कर्मचाऱ्यानं मला सांगितलं’.

‘माझी अवस्था बघून पोलीस परत गेले’

हा प्रकार माझ्यासोबत कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात झालाय. रिपोर्टमध्ये माझा बीपी, शुगर लेव्हल लो दाखवत होते. तरीही रात्री अडीच वाजता दोनशे पोलीस मला डिस्चार्ज करण्यासाठी आले. आताच्या आता डिस्चार्ज करा आणि अटक करुन जेलमध्ये टाका. पोलीस आले तेव्हा त्यांनी पाहिलं की अवस्था खरंच खराब आहे. तेव्हा ते पोलीस बाहेर गेले, असा दावा नितेश राणे यांनी केलाय.

‘विरोधकांना जिवंतच ठेवायचं नाही असा प्रकार सुरु’

पोलिसांवर वारंवार दबाव टाकला जात होता, मुंबईकडून फोन येत होते, वारंवार कलानगर परिसरातून फोन येत होते, की यांना कुठल्याही पद्धतीत डिस्चार्ज करा आणि अटक करा. अशा पद्धतीचा व्यवहार त्या एका केसमध्ये सुरु होता. विरोधी पक्षाच्या लोकांना सभागृहात येऊच द्यायचं नाही, जिवंतच ठेवायचं नाही, असा प्रकार सुरु असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलाय.

इतर बातम्या : 

परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणांचा तपास CBI कडे जाणार! खासदार Sanjay Raut म्हणतात…

Devendra Fadnavis: ‘दादांचीही’ नसेल एवढी… बारामती ते मुंबईपर्यंत प्रॉपर्टी घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कुंडली फडणवीसांनी मांडली, मलिक कनेक्शन?

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....