AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंसाचारानंतरही पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्यांमध्ये 72 लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजेच 17 जागांसाठी मतदान झालं. तर उत्तर प्रदेशमध्ये 13, राजस्थानमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 8, मध्य प्रदेशात 6, ओदिशात 6, बिहारमध्ये 5, झारखंडमध्ये 3 आणि जम्मू-काश्मिरच्या एका जागेसाठी मतदान पार पडलं. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यात […]

हिंसाचारानंतरही पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मतदान
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्यांमध्ये 72 लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजेच 17 जागांसाठी मतदान झालं. तर उत्तर प्रदेशमध्ये 13, राजस्थानमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 8, मध्य प्रदेशात 6, ओदिशात 6, बिहारमध्ये 5, झारखंडमध्ये 3 आणि जम्मू-काश्मिरच्या एका जागेसाठी मतदान पार पडलं. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यात एकूण 64 टक्के मतदान झालं. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 76.44 टक्के मतदान झालं.

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये 54.16 टक्के, राजस्थानमध्ये 64.87 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 76.44 टक्के, मध्य प्रदेशात 66.14 टक्के, ओदिशात 64.05 टक्के, बिहारमध्ये 57.95 टक्के, झारखंडमध्ये 63.77 टक्के आणि जम्मू-काश्मिरमध्ये 9.79 टक्के मतदान पार पडलं.

पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मतदान

चौथ्या टप्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 76.44 टक्के मतदान पार पडलं. मात्र, पश्चिम बंगालमध्ये यावेळी दहशतीचं वातावरण बघायला मिळालं. मतदान सुरु झाल्याच्या काहीच तासात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली. बीरभूर येथील नानूर, रामपूरहाट नलहाटी आणि सिउरी या क्षेत्रांत विरोधी पक्षांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. तर दुहराजपूर क्षेत्रात मतदारांना आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये हाणामारी झाली. एका मतदान केंद्राबाहेर टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार बाबूल सुप्रियो यांच्या वाहनाची तोडफोड केली. दुसरीकडे, काही समाजकंटकांनी धमकावल्यामुळे मतदान केंद्रातील मतदाता केंद्र सोडून पळून गेल्याची घटना घडली आहे.

पश्चिम बंगालच्या आसनसोल येथे मतदानाचा दिवस हा वादाचा दिवस ठरला. आसनसोलच्या जेमुआ मतदान केंद्र क्रमांक 222 आणि 226 वर ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या अनुपस्थितीत मतदानावर बहिष्कार टाकला. तर मतदान केंद्र क्रमांक 199 वर टीएमसी कार्यकर्ता आणि सुरक्षा दल यांच्यात वाद झाला.

निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्री आणि आसनसोल येथून  भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर मतदान केंद्रात जबरदस्ती घुसून तिथल्या टीएमसीचे कार्यकर्ते आणि उपस्थित अधिकाऱ्यांशी चुकीची वागणूक केल्याचा आरोप आहे.

मुंबईत आज 6 लोकसभेच्या जागांसाठी मतदान पार पडलं. यावेळी मुंबईकरांमध्ये मतदानासाठीची जागरुकता आणि उत्सुकता बघायला मिळाली. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. यावेळी मुंबईत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50 टक्क्यांच्यावर मतदान झालं.  मतदानासाठी मुंबईत नेते अभिनेत्यांसह सेलिब्रिटींनीही मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला. उद्योगपती अनिल अंबानी, अभिनेते शाहरुख, बच्चन कुटुंबीय, गीतकार गुलजार, रणबीर कपूर, करिना कपूर, रणवीर सिंह, ऋतिक रोशन, सलमान खान, प्रियांका चोप्रा, मुकेश अंबानी, नीता अंबानी, नरेश गोयल, जावेद अख्तर, आमिर खान यांसारख्या दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला.

पाहा व्हिडीओ :

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!