विरार : राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेलं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाही. सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. भाजपच्या आरक्षणविरोधी धोरणामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्याचा घणाघात पटोले यांनी केलाय. तसंच भाजपनं देश विकण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी यावेळी केलाय. ते आज विरारमध्ये बोलत होते. (Nana Patole criticizes BJP over OBC reservation, ZP and Panchayat Samiti elections)