AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाच्या आरक्षण विरोधी धोरणामुळे झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, नाना पटोलेंचा घणाघात

भाजपच्या आरक्षणविरोधी धोरणामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्याचा घणाघात पटोले यांनी केलाय. तसंच भाजपनं देश विकण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी यावेळी केलाय. ते आज विरारमध्ये बोलत होते.

भाजपाच्या आरक्षण विरोधी धोरणामुळे झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, नाना पटोलेंचा घणाघात
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 3:10 PM
Share

विरार : राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेलं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाही. सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. भाजपच्या आरक्षणविरोधी धोरणामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्याचा घणाघात पटोले यांनी केलाय. तसंच भाजपनं देश विकण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी यावेळी केलाय. ते आज विरारमध्ये बोलत होते. (Nana Patole criticizes BJP over OBC reservation, ZP and Panchayat Samiti elections)

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी नाना पटोले हे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर आहेत. वसई तालुक्यातील तिल्हेर गणातील निकिता पाटील आणि भाताने गणातील पांडुरंग जाधव यांच्या प्रचारासाठी पटोले यांनी तिल्हेर इथं पहिली सभा घेतली. त्यावेळी पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

‘ओबीसी आरक्षण संपवण्याचा भाजपचा घाट’

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्या आहेत, त्याला भाजप कारणीभूत आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. तर भाजप मात्र आरक्षण संपवायला निघाला आहे, असा आरोप पटोले यांनी केलाय. देशाला विकून देश चालवण्याचं काम भाजप करत आहे. पण आता भाजपला संपवण्यासाठी आणि देश चालवण्यासाठी एकमेव काँग्रेस पक्ष असल्याचं लोकांना कळायला लागल्याचं पटोले यांनी म्हटलंय.

‘बुलेट ट्रेन ही विशिष्ट लोकांसाठीच’

बुलेट ट्रेन प्रकल्पावरुनही नाना पटोलेंनी भाजपवर टीका केलीय. बुलेट ट्रेन ही विशिष्ट लोकांसाठी आहे. मुंबईला विकायचं आणि सुरतला न्यायचं असा भाजपचा पवित्रा आहे. केंद्र आणि फडणवीस यांच्या दबावातून बुलेट ट्रेन आणण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

अमित शाहांना टोला

भाजपची सत्ता आल्यानंतर माजी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुलाचं उत्पन्न हजार पटीनं वाढलं. अशी काय चादूची कांडी आहे की त्यांचं उत्पन्न इतकं झपाट्यानं वाढलं. ते देशातील तरुणांनाही सांगा म्हणून तरुणांची बेकारी जाईल, असं पत्र आपण अमित शाहांना लिहिल्याचं सांगत पटोले यांनी शाहांना जोरदार टोला लगावलाय.

‘भाजपला दिवसाही स्वप्न पडत आहेत’

काँग्रेसनं महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे आणि तो 5 वर्षे कायम राहील, असा दावाही पटोले यांनी केलाय. तसंच भाजपला दिवसाही स्वप्न पडत आहेत. कधी दिवसा, तर कधी पहाटे ते मंत्री बनतात. त्यांना दिवा स्वप्न पडतात ते आम्ही कशाला आडवा, अशा शब्दात पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.

इतर बातम्या :

“चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापुरामुळे आम्ही शेतकरी गेलो सरणावर…! अन् माझ्या सरणावरची फुले..” सदाभाऊ खोत यांचं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर टीकास्त्र

आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

Nana Patole criticizes BJP over OBC reservation, ZP and Panchayat Samiti elections

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.