AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोका तसाच राहिलाय, फक्त… प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली राणा आणि बच्चू कडू वादातील बिटवीन द लाईन

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाकडे तुम्ही कसं पाहता? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

खोका तसाच राहिलाय, फक्त... प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली राणा आणि बच्चू कडू वादातील बिटवीन द लाईन
प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली राणा आणि बच्चू कडू वादातील बिटवीन द लाईनImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 02, 2022 | 3:04 PM
Share

अकोला: भाजप समर्थक आमदार रवी राणा (ravi rana) आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांच्यातील खोक्यावरून सुरू झालेला वाद मिटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याने दोन्ही नेत्यांनी दोन पावलं मागे घेत हा वाद संपल्याचं जाहीर केलं. मात्र, हा वाद संपला असला तरी या वादाची पडलेली ठिणगी अजूनही धुमसताना दिसत आहे. आता या वादावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एवढंच नव्हेतर आंबेडकर यांनी या वादातील बिटवीन द लाईन एका वाक्यातच सांगितली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सध्या अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत. आठ ते दहा दिवस ते विदर्भात असणार आहेत. विदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे आणि छोट्या सभांना ते हजेरी लावणार आहेत.

तसेच संघटनात्मक बाबींवर पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करणार आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पण मोजकीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाकडे तुम्ही कसं पाहता? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद म्हणजे खोका तसाच राहिला फक्त आरोपावरती पडदा पडला, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या शिवसेनेसोबत आघाडी करणार आहात का? असा सवाल केला असता आंबेडकर यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. दरम्यान, आंबेडकर हे आज जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार असून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.

दरम्यान, बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद संपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांना बोलावून घेतलं होतं. या दोन्ही नेत्यांची समजूत घालण्यात आली.

त्यानंतर रवी राणा यांनी मीडियाशी संवाद साधताना आमच्यातील वाद संपल्याचं जाहीर केलं. तसेच यापुढे कुणीही एकमेकांवर आगपाखड करणार नसल्याचं जाहीर केलं.

त्यानंतर बच्चू कडू यांनी काल अमरावतीत जाहीर मेळावा घेऊन वाद संपल्याचं जाहीर केलं. पण आपल्या भाषणात ते रवी राणा यांना इशाराही देण्यास विसरले नाही. आम्हाला त्रास दिला तर आम्हीही मागे पुढे पाहणार नाही. पण आम्ही कुणाच्या वाट्याला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.