AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशीलकुमार शिंदेंसोबतच्या भेटीवर अखेर प्रकाश आंबेडकरांनी मौन सोडलं!

सोलापूर : महाराष्ट्रासह देशाचं लक्ष सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. इथून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसकडून, तर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात आहेत. भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य लढत आहेत. अशी तिरंगी चुरशीची लढत होत असताना, काल अचानक एक फोटो ससमोर आला. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचा फोटो असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात […]

सुशीलकुमार शिंदेंसोबतच्या भेटीवर अखेर प्रकाश आंबेडकरांनी मौन सोडलं!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

सोलापूर : महाराष्ट्रासह देशाचं लक्ष सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. इथून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसकडून, तर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात आहेत. भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य लढत आहेत. अशी तिरंगी चुरशीची लढत होत असताना, काल अचानक एक फोटो ससमोर आला. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचा फोटो असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अखेर या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांनी मौन सोडलं आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. भेटीचे राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांना जमतं. निवडणूक म्हणजे दुश्मनी असं मी कधीच मानलं नाही. कुणाला तरी  भेटायचे आणि फोटो व्हायरल करायचे, हे काँग्रेसचे डावपेच आहेत.”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वाचा : सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

दुसरीकडे, सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने सोलापूर शहरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरकरांनी सुशीलकुमार शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लगेचच ही भेट झाली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापूर लोकसभेसाठी येत्या 18 एप्रिलला मतदान होत आहे.

माझी शेवटची निवडणूक

माझी शेवटची निवडणूक आहे. शेवटच्या निवडणुकीत मला शरद पवारांची साथ हवीय, असे भावनिक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. सोलापुरात आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या निर्धार मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेही उपस्थित होते.

2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांचेही आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.