AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pratap Sarnaik : प्रताप सरनाईकांनी सांगितले बंडामागचे कारण..! दोन मिनिटांमध्ये सर्व उलगडा

ठाकरे घरणाच्या अतिशय जवळचे म्हणून माझी ओळख होती. पण ईडीच्या चौकशी दरम्यान मिळालेली वागणूक ही न सांगण्यासारखी आहे. त्या दरम्यानच्या काळात कोणी जवळ तर यायला तयार नव्हतेच पण माझ्यासोबत कोणी सल्फीदेखील काढायला तयार नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले. ज्यावेळी मला आदाराची गरज होती त्याचवेळी सर्वजण साथ सोडून गेले होते.

Pratap Sarnaik : प्रताप सरनाईकांनी सांगितले बंडामागचे कारण..! दोन मिनिटांमध्ये सर्व उलगडा
प्रताप सरनाईक
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 04, 2022 | 3:43 PM
Share

मुंबई : शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरीची भूमिका का घेतली यामागचे कारण आता समोर येऊ लागले आहे. (Assembly) विधानसभेत शिंदे गट आणि भाजपाचे बहुमत झाल्यानंतर आमदारांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी (Pratap Sarnaik) प्रताप सरनाईक यांनी तर बंडमागचे कारण तर सांगितलेच पण ठाकरे कुटुंब कसे होते याचा देखील उलगडा कोला. दरम्यान, मतदा करताना प्रताप सरनाईक हे उभारले असता (ED) ईडी..ईडी अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. पण याचे उत्तर नंतर देतो म्हणणाऱ्या नाईकांनी ईडी दरम्यानचा काळच बंडासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगितले. ईडी कडून चौकशी सुरु असताना देण्यात आलेली दुय्यम वागणूक यामुळेच आपण निर्णय घेतल्याचे सांगितले. तर दुसरीकडे ठाकरेंशी कौटुंबिक संबंध असल्याचे म्हणत आपण त्यांच्याबद्दल नाराजी नाही हे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणी कशासाठी बंडाचा निर्णय घेतला हे आता समोर येऊ लागले आहे.

दुय्यम वागणुकीमुळेच मन व्यथित

ठाकरे घरणाच्या अतिशय जवळचे म्हणून माझी ओळख होती. पण ईडीच्या चौकशी दरम्यान मिळालेली वागणूक ही न सांगण्यासारखी आहे. त्या दरम्यानच्या काळात कोणी जवळ तर यायला तयार नव्हतेच पण माझ्यासोबत कोणी सल्फीदेखील काढायला तयार नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले. ज्यावेळी मला आदाराची गरज होती त्याचवेळी सर्वजण साथ सोडून गेले होते. कोणी फोनही उचलण्यास तयार नव्हते. मी देवासमोर प्रार्थना करीत होते की अशी वेळ कुणावरही येऊ नये. मात्र, त्या काळात कोणीही साथ दिली नसल्यानेच हा निर्णय घेतल्याचे नाईक म्हणाले.

असे होते ठाकरे कुटुंबाशी नाते

प्रताप सरनाईक आणि ठाकरे कुटुंबियांचे संबंध जवळचे होते. केवळ राजकारणच नाहीतर त्यांची मुले आणि आदित्य ठाकरे हे चांगले मित्र आहेत तर रश्मी ठाकरे आणि नाईक हे एकाच वर्गात शिकत होते. एवढे सर्व असतानाही जसे पाहिजे तसे सहकार्य ना शासनाकडून मिळाले ना पक्षातील इतरांकडून मिळाले. त्यामुळे किती दिवस सहन करायचे म्हणून हा टोकाचा निर्णय घेतला. असे असतानाही मात्र, त्यांनी ईडी कारवाईच्या धास्तीनेच हा निर्णय घेतल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात होता.

म्हणून एकनाथ शिंदे यांची साथ

जेव्हा सर्वकाही संपत होते त्या प्रतिकूल परस्थितीमध्ये केवळ शिवसेनेतील एका नेत्याने साथ दिली तो म्हणजे एकनाथ शिंदे असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. राजकारणामध्ये काहीही होईल पण मला गरजेच्या वेळी तेच धावून आले आहेत. त्यांनीच मायेची थाप मारल्यामुळे मी त्या कठीण प्रसंगातून सावरलो असल्याचेही नाईक म्हणाले. त्यांची आणि माझी राजकीय सुरवात एकत्र झाली होती. आज ठाणेकर महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहे याचा आपल्याला अभिमान असल्याचे ते म्हणाले. शिवाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आगामी 20 वर्ष सरकार चालवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच