देगलूरमध्ये भाजपचा पराभव का झाला ? प्रविण दरेकर यांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले…

मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे भाजपची रणनीती नेमकी कुठे चुकली ? जनतेने भाजपविषयीची आपले मते बदलली आहेत का ? असे प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव का झाला याची नेमकी कारणं सांगतली आहेत. मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मतं केली असं दरेकर यांनी म्हटलंय.

देगलूरमध्ये भाजपचा पराभव का झाला ? प्रविण दरेकर यांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले...
प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 6:31 PM

मुंबई : देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला. भाजपचे उमेदवार सुभाष साबने यांचा तब्बल 41 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे विजयी ठरले. मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे भाजपची रणनीती नेमकी कुठे चुकली ? जनतेची भाजपविषयीची आपली मते बदलली आहेत का ? असे प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव का झाला असावा, याची नेमकी कारणं सांगतली आहेत. मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मतं केली असं दरेकर यांनी म्हटलंय.

प्रविण दरेकर नेमकं काय म्हणाले ?

“पंढरपुरात ताकदीने लढलो त्याचप्रमाणे देगलूरला ही लढलो. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. त्याला अनेक कारणं असतात. गेल्यावेळी शिवसेना-भाजपला मतं पडली होती त्याच्यापेक्षा जास्त मतं यावेळी भाजपच्या उमेदवाराला पडली आहेत. निवडणुकीत मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मतदान केलं. तसेच वंचित बुहजन आघाडी 25 हजाराचे मत देईल, असा मला वाटलं होतं. पण पराभव हा पराभव असतो. तो आम्ही खुल्या मनाने स्वीकारला आहे,” असे प्रविण दरेकर म्हणाले. तसेच महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला जमला म्हणतात. मग तो फॉर्म्यूला पंढरपुरात का जमला नाही, असा सवालदेखील त्यांनी केला.

जनतेने दिलेला कौल मान्य, कुठे चूक झाली यावर अभ्यास करणार- साबने

दरम्यान देगलूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल लागला. या निकालात काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर 41933 मतांच्या फरकाने विजय मिळवला. अंतापूरकर यांना एकूण 108840 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सुभाष साबने यांना 66907 मते मिळाली. पराभव झाल्यानंतर साबने यांनी आम्हाला निकाल मान्य आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो. तसेच काय चुका झाल्या यावर विचार करुन पुढच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागू असे साबने म्हणाले होते

इतर बातम्या :

Weather Forecast : कोकण, मराठवाडा ते दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री, आघाडीच्या वरिष्ठांकडे मांडणार; दरेकरांच्या भेटीनंतर परबांचं आश्वासन

Jobs: ऐन दिवाळीत गोड बातमी, सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.