AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांनी पिंपरीत खूप मोठं काम केलं, पण नशिबी काय आलं, तर पराभव – राज ठाकरे

अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये खूप मोठं काम केलं पण नशिबी पराभवच आला, अशा शब्दात राज यांनी सध्या फक्त विकासकामांवर निवडणूक जिंकता येत नसल्याचं मत व्यक्त केलं.

अजित पवारांनी पिंपरीत खूप मोठं काम केलं, पण नशिबी काय आलं, तर पराभव - राज ठाकरे
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
| Edited By: | Updated on: Jun 01, 2021 | 6:41 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसत्ता या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर महत्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी नाशिक महापालिका निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना राज यांनी एक खंतही बोलून दाखवली. इतकंच नाही तर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये खूप मोठं काम केलं पण नशिबी पराभवच आला, अशा शब्दात राज यांनी सध्या फक्त विकासकामांवर निवडणूक जिंकता येत नसल्याचं मत व्यक्त केलं. जो लाट निर्माण करण्यात यशस्वी होतो तो जिंकतो, अशी परिस्थिती आजच्या निवडणुकांबाबत झाल्याचंही राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray on Ajit Pawar and mahapalika Elections)

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर आम्ही खूप काम केलं. 5 वर्षाच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. नाशिकचा पाण्याचा प्रश्न आम्ही कायमचा मिटवला. नाशिकमधील रस्ते आम्ही चांगले केले. पावसाळ्यात मुंबई, पुण्यातील रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले पण नाशिकमध्ये पत्रकारांना खड्डे मिळाले नाहीत. मुंबई, पुण्यात गेली इतकी वर्षे ज्या लोकांना, उद्योगपतींना सत्ताधाऱ्यांना आणणं झालं नाही. अशा लोकांना मी नाशिकमध्ये आणलं. त्यांच्यामार्फत विकासकामं केली. हे चांगलं आहे की वाईट? लोकांनी साथ दिली तर हुरुप येतो. लोकांना नेमकं काय हवं आहे? इतरांसाखरंच वागायचं का?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलाय.

‘भ्रष्टाचाऱ्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही’

अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये खूप चांगलं काम केलं. पण त्यांच्या नशिबी शेवटी पराभवच आला. समाजाने काम केलं तर शाबासकी द्यावी, काम करत नसेल त्याला बाजूला करावं. चांगलं काम केलं तर शाबासकी आणि भ्रष्टाचार केला तर शिक्षा होत नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही. कायद्याची भीती नसेल तर गुन्हेगारी वाढणार. तसंच राजकारणात काहीही काम न करता निवडणुकीवेळी पैसे वाटायचे आणि मतं मिळवायची अशावेळी लोकांनी त्याला मतपेटीतून शिक्षा दिली नाही तोपर्यंत काही होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. हे सांगताना आपण आशावादी असल्याचं सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत.

‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’

मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितलं जातं. भारतात निवडणुका प्रतिकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केलं. तर बाळासाहेबांना पाहून सत्ता दिली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. देशात जो लाट निर्माण करतो तो जिंकतो. तसंच झालं. सध्या कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा, अनिल देशमुखांची तात्काळ उच्चस्तरिय चौकशी करा : राज ठाकरे कडाडले

आधी वीज बिल माफ करु म्हणाले, अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर नाही म्हणाले : राज ठाकरे

Raj Thackeray on Ajit Pawar and mahapalika Elections

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.