AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना गो-गोप्रमाणे महाविकासआघाडी गो-गो म्हणावं लागेल : रामदास आठवले

भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोना गो, कोरोना गोसोबतच एक नवी घोषणा दिली आहे (Ramdas Athawle on MahaVikasAghadi Go Go).

कोरोना गो-गोप्रमाणे महाविकासआघाडी गो-गो म्हणावं लागेल : रामदास आठवले
| Updated on: Mar 12, 2020 | 3:58 PM
Share

मुंबई : भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोना गो, कोरोना गोसोबतच एक नवी घोषणा दिली आहे (Ramdas Athawle on MahaVikasAghadi Go Go). त्यांनी कोरोना गोसोबतच आता महाविकासआघाडी गो-गोचा नाराही दिला आहे. तसेच मध्यप्रदेशातील व्हायरस महाराष्ट्रातही यावं असंही म्हटलं.

रामदास आठवले म्हणाले, “मी कोरोना गो असं म्हटलं आहे. कोरोना महाराष्ट्रात किंवा भारतात जास्त आलेला नाही. तरीही आम्ही कोरोनाला जायला सांगितलं आहे. त्याची काळजी घेण्याची जबाबदारी डॉक्टरांसोबत आपल्यावर आहे. कोरोना आपल्यात, आपल्या गावात, आपल्या देशात यायला नको. यासाठी जी काळजी घ्यायला हवी ती घेतली पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत कोरोना जात नाही, तोपर्यंत कोरोना गो कोरोना गो असं आम्ही म्हणत राहणार आहोत. मात्र, कोरोना गो म्हणत असताना महाविकास आघाडी गो-गो असं आम्हाला म्हणावं लागेल.”

उद्धव ठाकरेंना हेच सांगणं आहे की त्यांनी काँग्रेस-राष्ट्रावादीच्या चक्रव्युहात जास्त अडकू नये. आपली परंपरा, विचारधारा पाहता बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करायचं असेल, तर आपण पुन्हा भाजपमध्ये आलं पाहिजे. भाजप, शिवसेना आणि आरपीआयचं सरकार महाराष्ट्रात आलं पाहिजे. आपण आला नाही, तर भूकंप होण्याची शक्यता आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.

“मध्य प्रदेशमधील व्हायरस महाराष्ट्रातही यावा”

रामदास आठवले म्हणाले, “ज्योतिरादित्य शिंदे हे महाराष्ट्रातीलच आहेत. ते मराठी भाषिक आहेत. ते भाजपमध्ये आले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. आता मध्य प्रदेशचा जो व्हायरस आहे, तो महाराष्ट्रातही आला पाहिजे. महाराष्ट्रात असा भूकंप होणं आवश्यक आहे. शरद पवार असा भूकंप होणार नाही असं म्हणत असले तरी भूकंप कधी होतो हे लक्षात येत नाही. भूकंप अचानक होतो. त्यामुळे महाराष्ट्रात देखील भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही.”

संबंधित बातम्या:

मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही भूकंप होणार : रामदास आठवले

Ramdas Athawle on MahaVikasAghadi Go Go

Follow Us
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.