AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना गो-गोप्रमाणे महाविकासआघाडी गो-गो म्हणावं लागेल : रामदास आठवले

भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोना गो, कोरोना गोसोबतच एक नवी घोषणा दिली आहे (Ramdas Athawle on MahaVikasAghadi Go Go).

कोरोना गो-गोप्रमाणे महाविकासआघाडी गो-गो म्हणावं लागेल : रामदास आठवले
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 12, 2020 | 3:58 PM
Share

मुंबई : भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोना गो, कोरोना गोसोबतच एक नवी घोषणा दिली आहे (Ramdas Athawle on MahaVikasAghadi Go Go). त्यांनी कोरोना गोसोबतच आता महाविकासआघाडी गो-गोचा नाराही दिला आहे. तसेच मध्यप्रदेशातील व्हायरस महाराष्ट्रातही यावं असंही म्हटलं.

रामदास आठवले म्हणाले, “मी कोरोना गो असं म्हटलं आहे. कोरोना महाराष्ट्रात किंवा भारतात जास्त आलेला नाही. तरीही आम्ही कोरोनाला जायला सांगितलं आहे. त्याची काळजी घेण्याची जबाबदारी डॉक्टरांसोबत आपल्यावर आहे. कोरोना आपल्यात, आपल्या गावात, आपल्या देशात यायला नको. यासाठी जी काळजी घ्यायला हवी ती घेतली पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत कोरोना जात नाही, तोपर्यंत कोरोना गो कोरोना गो असं आम्ही म्हणत राहणार आहोत. मात्र, कोरोना गो म्हणत असताना महाविकास आघाडी गो-गो असं आम्हाला म्हणावं लागेल.”

उद्धव ठाकरेंना हेच सांगणं आहे की त्यांनी काँग्रेस-राष्ट्रावादीच्या चक्रव्युहात जास्त अडकू नये. आपली परंपरा, विचारधारा पाहता बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करायचं असेल, तर आपण पुन्हा भाजपमध्ये आलं पाहिजे. भाजप, शिवसेना आणि आरपीआयचं सरकार महाराष्ट्रात आलं पाहिजे. आपण आला नाही, तर भूकंप होण्याची शक्यता आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.

“मध्य प्रदेशमधील व्हायरस महाराष्ट्रातही यावा”

रामदास आठवले म्हणाले, “ज्योतिरादित्य शिंदे हे महाराष्ट्रातीलच आहेत. ते मराठी भाषिक आहेत. ते भाजपमध्ये आले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. आता मध्य प्रदेशचा जो व्हायरस आहे, तो महाराष्ट्रातही आला पाहिजे. महाराष्ट्रात असा भूकंप होणं आवश्यक आहे. शरद पवार असा भूकंप होणार नाही असं म्हणत असले तरी भूकंप कधी होतो हे लक्षात येत नाही. भूकंप अचानक होतो. त्यामुळे महाराष्ट्रात देखील भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही.”

संबंधित बातम्या:

मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही भूकंप होणार : रामदास आठवले

Ramdas Athawle on MahaVikasAghadi Go Go

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती