AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रिपदाचं न दिलेलं आश्वासन आठवतं, पण शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर, दानवेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

"मुख्यमंत्रिपदाचं न दिलेलं आश्वासन लक्षात. मात्र, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन विसरले," असा हल्लाबोल दानवे यांनी शिवसेनेवर केला.

मुख्यमंत्रिपदाचं न दिलेलं आश्वासन आठवतं, पण शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर, दानवेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
| Updated on: Nov 29, 2020 | 5:32 PM
Share

औरंगाबाद :उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचं न दिलेलं आश्वासन लक्षात आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिलेले आश्सासन ते विसरले,” असा हल्लाबोल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंवर त्यांचे नाव न घेता केला. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. 28 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने दानवे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. (Raosaheb Danve criticizes shiv sena and Uddhav Thackeray)

“निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत असलेल्या प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा वेगळा होता. प्रत्येकाचं आश्वासन वेगळं होतं. निवडणुकीनंतर यांचं कृत्रिम सरकार आलं. निवडणुकीनंतर हे पक्ष एकत्र आले. आमचा मित्रपक्ष आम्हाला सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेला. मित्रपक्षानं जाताना सांगितलं की भाजपनं मुख्यमंत्रिपदाचं आश्वासान दिलं होतं. मुख्यमंत्र्यांना हे लक्षात राहतं, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासंबंधी दिलेलं आश्वासन लक्षात राहीलं नाही. शिवसेनेने बागायती शेतीसाठी 50 हजार तर कोरडवाहू शेतीसाठी 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे सगळं ते विसरले,” असं दानवे म्हणाले. तसेच, यावेळी बोलताना आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं कुठलंही आश्वासन दिलं नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

महिलांवरील अत्याचारांत वाढ

यावेळी बोलताना, त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केला. राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाल्याचं ते म्हणाले. “या सरकारची कामगिरी पूर्णपणे असमाधानकार आहे. राज्यात महिलांवरील अत्यांचारांत वाढ होत आहे. पनवेलमध्ये बलात्काराची घडना घडली. बुलडाणा, जळगाव, मंठा, मुंबई येथे महिलांवर छेडछाड, बलात्काराच्या घटना घडल्या. वरील घटनांवरुन सरकारचं महिलांप्रतीचं धोरण उदासीन असल्याचं स्पष्ट होतं, असा आरोप त्यांनी ठाकरे सरकारवर केला.

मराठा आरक्षणाचा केंद्राशी  संबंध नाही

मराठा आरक्षण हा राज्याचा कायदा आहे. याचा केंद्राशी काहीही संबंध नाही. पण तरीही केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे, असे म्हणत दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला घेरलं. तसेच, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात सहकार्य करत नसल्याची माहिती अ‌ॅड. मुकूल रोहतगी यांनी दिलेली आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो’, उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही; उदयनराजेंचा सवाल

(Raosaheb Danve criticizes shiv sena and Uddhav Thackeray)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.