भोर, पुणे : अतिवृष्टीमुळे राज्यात शेती पिकांचं मोठं नुकसान (Crop Loss) झालंय. गोगलगाय आणि अन्य आपत्तीमुळेही शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. काही भागात पुराच्या पाणी गावात शिरल्यानं घरांचंही नुकसान झालंय. अशा सर्वांना मदतीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) आज निर्णय घेण्यात आला. एनडीआरएफच्या निकषाचा दुप्पट मदत सरकार करेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिंदे यांच्या घोषणेनुसार ही मदत हेक्टरी 13 हजार 600 वर जाते. मात्र ही मदत तुटपुंजी असून सरकारने जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा असल्याची टीका काँग्रेस आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी केलीय.