AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपचे हस्तक?; संजय राऊत यांचा टोमणा काय?

"रामदास आठवले, जोगेंद्र कराडे, राजेंद्र गवई हे सर्व आंबेडकरांच्या खरे वारसदार विचारधारेचे शिलेदार आहेत, असं आम्ही म्हणालो तर त्यात काहीही चुकीचं नाही", असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपचे हस्तक?; संजय राऊत यांचा टोमणा काय?
| Updated on: Aug 14, 2024 | 11:22 AM
Share

Sanjay Raut Criticise Raj Thackeray : “आम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना 7 जागा देणार होतो. अकोल्यासह सात जागांचा यात समावेश होता. तरीही ते त्यांच्या बाजूला वळले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिकेचा अजिबात विचार करत नाहीत”, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विचाराबद्दल आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल भाष्य केले. “प्रकाश आंबेडकर हे आंबडेकर आहेत. आम्ही आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. या देशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. प्रकाश आंबेडकरांना जर याचे भान असते तर त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले नसते. रामदास आठवले, जोगेंद्र कराडे, राजेंद्र गवई हे सर्व आंबेडकरांच्या खरे वारसदार विचारधारेचे शिलेदार आहेत, असं आम्ही म्हणालो तर त्यात काहीही चुकीचं नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

“गेली अनेक वर्ष रामदास आठवले या महाराष्ट्रात आंबेडकरांचा विचार पुढे नेत आहेत. गेली अनेक वर्ष ते सत्तेत आहेत. त्यांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशात ज्या पद्धतीने काम करत होते, त्यापद्धतीनेच आठवले हे काम करत आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा, संघटना याचे खरे वारसदार हे रामदास आठवले आहेत, असे म्हणायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशावर मोठे उपकार आहेत”, असेही संजय राऊतांनी यावेळी म्हटले.

प्रकाश आंबडेकर आमच्यासोबत येणार होते, पण…

“प्रकाश आंबडेकर हे आमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करत होते. ते महाविकासआघाडीचे घटक होते. लोकसभेत आम्ही त्यांना ७ जागा देणार होतो. अकोल्यासह सात जागांचा यात समावेश होता. तरीही ते त्यांच्या बाजूला वळले, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिकेचा विचार अजिबात करत नाहीत”, असा धक्कादायक खुलासाही संजय राऊतांनी केला.

महाराष्ट्रात भाजपचे दोन हस्तक

“आपल्या भूमिकेमुळे राष्ट्रद्रोही शक्तींना, धर्मांध शक्तींना जर मदत होत असेल, मग ते कोणीही असो. या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत, जे अशाप्रकारे हस्तकाचे काम करतात. कधी मोदी-शाहांना पाठिंबा देतात, कधी बेईमान शिंदे गटाला पाठिंबा देतात, हे दोन महाराष्ट्रातील जे नेते आहेत. त्यांच्यावर आता महाराष्ट्राला विचार करण्याची वेळ आली. लोकसभेत यांचं कोणी ऐकलं नाही. पाडापाडी करणं आणि त्या बदल्यात व्यवहार करणं हे यांचं काम आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या धर्मांध शक्तींना धडा शिकवायला हवा. या हस्तकांनी संपूर्ण देशात उमेदवार उभे करायला हवेत, म्हणजे त्यांना जास्त पैसे मिळतील. महाराष्ट्रात त्यांना कमी पैसे मिळतात. देशात त्यांना जास्त पैसे मिळतील”, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

Follow Us
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......