5

तेजस्वी यादव बिहार निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ : संजय राऊत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये राजदच्या नेतृत्वाखालील महागठबंधनने आघाडी घेतल्याचं चित्रं होतं, मात्र दुपारनंतर हे चित्रं पालटलं आणि एनडीएने सरशी घेतली आहे.

तेजस्वी यादव बिहार निवडणुकीचे 'मॅन ऑफ द मॅच' : संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 4:19 PM

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये राजदच्या नेतृत्वाखालील महागठबंधनने आघाडी घेतल्याचं चित्रं होतं, मात्र दुपारनंतर हे चित्रं पालटलं आणि एनडीएने सरशी घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने सध्या 77 जागांवर आघाडी घेतली आहे, तर राष्ट्रीय जनता दल (राजद) 65 जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जदयू पक्ष तिसऱ्या क्रमांकार आहे. या निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी एकट्याने भाजप आणि जदयूचा जोरदार सामना करत 65 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यांना त्यांच्या मित्रपक्षांकडून योग्य साथ न मिळाल्याने महागठबंधन बहुमतापासून लांब आहे. परंतु तेजस्वी यादव यांनी केलेल्या संघर्षाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील तेजस्वी यादव यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. (Bihar Election Result 2020 LIVE Updates)

संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत केवळ 30-40 टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल. आतापर्यंतचे निकाल एनडीएच्या (भाजप-जदयू) बाजूने लागले आहेत. परंतु मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे, तर राजदच्या तेजस्वी यादव यांनी एनडीएला जोरदार टक्कर दिली आहे. त्यामुळे तेजस्वी यादव या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले आहेत. तेजस्वी यादव यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हटलं पाहिजे कारण, कधी कधी एखादा संघ हरतो, परंतु पराभूत संघातील एक खेळाडू संपूर्ण टीमला पुढे घेऊन जातो, संघर्ष करतो, जिंकण्यासाठी ताकद पणाला लावतो. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या संघर्षामुळे या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हटलं पाहिजे.

राऊत म्हणाले की, तेजस्वी यादव यांनी एकट्याने सर्वांना तोंड दिलं आहे. त्यांना कोणाचीही मदत नव्हती. त्यांचे मित्रपक्ष कमजोर आहेत. मित्रपक्षांनीही मोठी मदत केली नाही. त्यांना सध्या त्यांच्या कुटुंबाचीदेखील मदत मिळालेली नाही. राज्यातील आणि देशातील सरकार त्यांच्या विरोधात आहे. केंद्रातील, राज्यातील मंत्री आणि अनेक बडे नेते त्यांच्या विरोधात आहेत, अशा प्रतिकूल परिस्थितीत तेजस्वी यादव यांनी सर्वांचा सामना केला आणि चांगलं यश मिळवलं आहे. त्यामुळे बिहारला एक मोठा राजकीय चेहरा मिळाला आहे.

भाजप ‘मोठा भाऊ’ ठरला तरीही मुख्यमंत्री नितीश कुमारच!

आतापर्यंत हाती आलेल्या निवडणुकीच्या कलानुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असलं तरी नितीश कुमार यांच्या JDUला भाजपपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत NDAची सत्ता आली तरी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील, असं भाजप नेत्यांकडून आवर्जुन सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. हा मोठा अनुभव गाठीशी असलेले भाजप नेते बिहारमध्ये धोका पत्करणार नाहीत. बिहारमध्ये भाजप जरी मोठा भाऊ ठरला तरी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

शिवसेनेने महाराष्ट्रात हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये भाजप शब्द फिरवणार नाही: राऊत

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

Bihar Election Result ! मतमोजणी धीम्यागतीने नाही, पण…; निकालाला उशीर का लागतोय? निवडणूक आयोगाने दिलं ‘हे’ कारण

Bihar Election: थोडी वाट पाहा, बिहारमध्ये महागठबंधनलाच बहुमत मिळणार; राजद नेत्याचा छातीठोक दावा

(Tejashwi Yadav is Man of the match in Bihar election result 2020 )

Non Stop LIVE Update
उद्योगमंत्री उद्य सामंत यांचे धक्कादायक विधान, तो एमओयु सापडत नाही
उद्योगमंत्री उद्य सामंत यांचे धक्कादायक विधान, तो एमओयु सापडत नाही
काय झाडी फेम शहाजी बापू पाटील याचं कुणाला आश्वासन? मंत्रीपद मागतो...
काय झाडी फेम शहाजी बापू पाटील याचं कुणाला आश्वासन? मंत्रीपद मागतो...
प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गात आडवे येणाते ते दोन भटजी कोण?
प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गात आडवे येणाते ते दोन भटजी कोण?
विधानसभा अध्यक्ष संतापतात तेव्हा..., म्हणाले 'मक्तेदारी चालणार नाही'
विधानसभा अध्यक्ष संतापतात तेव्हा..., म्हणाले 'मक्तेदारी चालणार नाही'
बदलापूरच्या तरुणाची 'ती' आदर्श कृती, परदेशात भारतीयांची मान उंचावली
बदलापूरच्या तरुणाची 'ती' आदर्श कृती, परदेशात भारतीयांची मान उंचावली
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?