AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष्यबाण गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले यापूर्वीही अनेकदा…

पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

धनुष्यबाण गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले यापूर्वीही अनेकदा...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2022 | 1:39 PM
Share

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं आहे. याचा मोठा फटका हा ठाकरे गटाला बसला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गट आणि शिंदे गटाला शिवसेना (Shiv sena) हे नाव देखील वापरता येणार नाहीये. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून चिन्हासाठी तीन तर नावासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहेत, या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत अनेक पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली आहेत. नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल असं यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं?

पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. या आधीही अनेक पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाविरोधात याचिका

एकाच चिन्हावर दोन्ही गटाने दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह अखेर गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं आता या चिन्हाचा दोन्ही गटाला वापर करता येणार नाहीये. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आता ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.  धनुष्यबाण गोठवण्यात आल्यानं ठाकरे समर्थक आक्रमक झाल्याचं पहायाला मिळत आहे. पुण्यात जोरदार पोस्टरबाजी सुरू आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.