AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir | काय योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना शंकराचार्यांचं सडेतोड उत्तर

Ram Mandir | "रामलला कुठे विराजमान होणार, मंदिरात ना? मंदिर पूर्ण झालय कि, नाही हे सांगा. निर्माण कार्य सुरु राहणार असं म्हणताय. तुम्ही सांगा जितक मंदिर झालय, तितकच ठेऊ आम्ही मान्य करु मंदिराच हेच स्वरुप आहे. तुम्ही पुढेही मंदिराच काम सुरु ठेवणार, याचा अर्थ काम अर्पूण आहे" असं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज म्हणाले.

Ram Mandir | काय योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना शंकराचार्यांचं सडेतोड उत्तर
shankaracharya-Narayan rane
| Updated on: Jan 15, 2024 | 12:19 PM
Share

Ram Mandir | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांच्या योगदानावर सवाल उपस्थित करताना, त्यांच्यावर टीका केली होती. आता ज्योतिष पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी नारायण राणेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “हजारो वर्षापासून देश गुलामित होता. विधर्मियोंच्या नियंत्रणाखाली होता. पण तरीही आज सनातन धर्म टिकून आहे. नारायण राणे आपले माता-पिता, आजी-आजोबांसोबत सनातन धर्माच पालन करतायत, त्यामागे कुठली 100 वर्षांची संघटना किंवा 45 वर्षांचा पक्ष नाहीय. हे अडीच हजार वर्षांपासूनच्या शंकराचार्यांच्या परंपरेमुळे शक्य झालय” असं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांनी म्हटलय.

शंकराचार्य राजकीय दृष्टीने पंतप्रधानांकडे पाहतायत, या नारायण राणे यांच्या वक्तव्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नाराजी व्यक्त केली. अन्य शंकराचार्य प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच स्वागत करतायत. मग तुम्ही नाराज का? तुम्हाला सुद्धा तिथे जाऊन आशिर्वाद द्यावा लागेल. त्यावर आम्ही सुद्धा आशिर्वादच देतोय, असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

‘आम्ही कुठे शाप दिलाय’

“आम्ही कुठे शाप दिलाय. आम्ही आतापर्यंत शाप शब्द उच्चारलेला नाही. आम्ही सुद्धा आशिर्वाद देतोय. नारायण राणेंना सुद्धा आशिर्वादच देतोय. त्यांच्या पक्षालाही सगळे आशिर्वाद देतायत. सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामया’ हा आमचा रोजचा पाठ आहे. आम्ही सगळ्यांना आशिर्वाद देतो. त्यात नारायण राणे आणि त्यांच्यासोबतचे लोक सुद्धा आहेत. आम्ही कधी शाप दिलाय?. जी धर्मशास्त्राची बाजू आहे, ती मांडण आमची जबाबदारी आहे. आम्ही फक्त आमच्या जबाबदारीच पालन करतोय” असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

‘आम्ही त्यांचे प्रवक्ते नाहीत’

अन्य शंकराचार्यांनी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच स्वागत आणि समर्थन केलं. त्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, “कोण काय करतय हे तुम्ही त्यांना विचारा. आम्ही त्यांचे प्रवक्ते नाहीत, त्यांच्या बाजूच विश्लेषण करु शकत नाही. आम्ही सगळ्यांबद्दल बोलू शकत नाही” “एक शंकराचार्य म्हणून सनातन धर्माच्या कुठल्याही आयोजनात शास्त्रीय पक्ष पाहण, त्याची समीक्षा करण आणि मार्गदर्शन ही जबाबदारी आहे. आम्ही त्याच जबाबदारीच पालन करतोय” असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.