AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेसोबत आम्ही दोघेही, ठाकरेंच्या कार्यपद्धतीत उणे काहीच नाही, फक्त… : शरद पवार

"शिवसेनेमध्ये नेतृत्वाने भूमिका घेतल्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची ही पद्धत आहे." असं शरद पवार 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले

शिवसेनेसोबत आम्ही दोघेही, ठाकरेंच्या कार्यपद्धतीत उणे काहीच नाही, फक्त... : शरद पवार
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jul 13, 2020 | 10:10 AM
Share

मुंबई : सरकार आघाडीचे आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीत उणे काहीच नाही, फक्त त्यांनी संवाद ठेवावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रदर्शित झाला. (Sharad Pawar in Saamana Interview express his expectations from CM Uddhav Thackeray)

“उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा वेगळी आहे. त्याचं कारण उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत शिवसेनेची आहे. शिवसेनेत आदेशाने काम करण्याची पद्धत आहे, हे मी सेनेच्या स्थापनेपासून पाहतोय.” असं पवार म्हणाले.

“काँग्रेस-राष्ट्रवादी आम्ही ज्या विचाराने वाढलोय, आम्ही वरिष्ठांच्या मतांचा आदर करतो, पण वरिष्ठांकडून आदेश येतोच असं नाही आणि समजा एखादे मत मांडले, तर त्यावर आम्ही चर्चा करु शकतो, ही आमच्या कार्यकारिणीची पद्धत आहे.” असे शरद पवार यांनी सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“शिवसेनेमध्ये नेतृत्वाने भूमिका घेतल्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची ही पद्धत आहे. या विचाराने तो पक्ष चालला आणि यशस्वीसुद्धा झाला. सध्याचे मुख्यमंत्री त्याच पठडीतले आहेत आणि माझी काहीच तक्रार नाही” असं पवारांनी सांगितलं.

“आम्हाला अजिबात कोणतीही अडचण नाही. मात्र सरकार आघाडीचे आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. आमच्या कामाची ही पद्धत नाही आणि आताचं जे सरकार आहे, ते एकट्याचं नाही. हे तिघांचं आहे आणि या तिघांमध्ये दोघांची काही मतं असतील, तर ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे” असं पवार म्हणाले.

“आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो, की आपण डायलॉग ठेवा. संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चा सुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही, फक्त डायलॉग दिसत नाही” असं म्हणत पवारांनी ठाकरेंकडून संवादाची अपेक्षा व्यक्त केली.

संबंधित बातम्या

शिवसेना भाजपपासून दूर व्हावी, या हेतूने ‘ते’ वक्तव्य केले : शरद पवार

फडणवीसांच्या गौप्यस्फोटात काही तथ्य नाही : शरद पवार

जेव्हा चिनी संरक्षण मंत्र्यांनी शरद पवारांना अज्ञातस्थळी नेले होते…

तुम्ही या सरकारचे ‘हेड मास्टर’ आहात की ‘रिमोट कंट्रोल’? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं

शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला : शरद पवार

फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार

(Sharad Pawar in Saamana Interview express his expectations from CM Uddhav Thackeray)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक