महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलू, पवारांचे चंद्रकांतदादांना चिमटे, उत्तर फडणवीसांकडून

"ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू?" असे टोले शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावले (Sharad Pawar taunts Chandrakant Patil)

महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलू, पवारांचे चंद्रकांतदादांना चिमटे, उत्तर फडणवीसांकडून
शरद पवार चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 12:07 PM

मुंबई : ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टोला लगावला. त्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चंद्रकांतदादांची कड घेतली. आमचे नेते कुठूनही निवडून येऊ शकतात, हे महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. (Sharad Pawar taunts Chandrakant Patil Devendra Fadnavis answers)

“महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं”

चंद्रकांत पाटील यांच्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता, “महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं” असं म्हणत शरद पवार मिश्किल हसले. “ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू?” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

“आमचे नेते कुठूनही निवडून येतात”

“पवार साहेब काय म्हणाले माहिती नाही. सगळ्यांनाच गाव सोडून इकडे तिकडे कधी ना कधी जावं लागतं. पण चंद्रकांत पाटील आपल्या गावातून दुसऱ्या गावात गेले, तरी निवडून आले ना. ते राज्याचे नेते आहेत. आमचे राज्याचे नेते कुठूनही निवडून येऊ शकतात, हे महत्त्वाचं आहे” असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली होती. पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. या प्रकरणातील तथ्य बाहेर काढलं पाहिजे. जे काही सत्य असेल बाहेर आणायला हवं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. (Sharad Pawar taunts Chandrakant Patil Devendra Fadnavis answers)

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई दबावात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पोलीस जोपर्यंत कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना खुलं मैदान आहे. पोलिसांवरील दबाव नाहिसा झाला पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी मग…

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घेतली नसल्याचं दिसतं. उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही, त्यांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलेले दिसत नाही. त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, क्लीप्स नीट ऐकाव्या यावरून कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते कळेल” असं देवेंद्र फडणवीस पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी म्हणाले.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांनी क्लिप नीट ऐकाव्या म्हणजे कळेल की कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय: देवेंद्र फडणवीस

शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे!

(Sharad Pawar taunts Chandrakant Patil Devendra Fadnavis answers)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.