AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांचं स्वप्न साकार, उद्धव ठाकरे 18 खासदारांसह अंबाबाईच्या दर्शनाला

उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापूरकडे रवाना झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी रवाना झाले.

बाळासाहेबांचं स्वप्न साकार, उद्धव ठाकरे 18 खासदारांसह अंबाबाईच्या दर्शनाला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jun 06, 2019 | 5:08 PM
Share

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सेनेच्या 18 खासदारांसह कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे आपल्या सर्व खासदारांसह जात आहेत. उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापूरकडे रवाना झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी रवाना झाले.

लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना-भाजप प्रचारसभेचा नारळ कोल्हापुरात फुटला होता. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा मानस दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता. मात्र कोल्हापुरात नेहमीच काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळत होतं.

यंदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय मंडलिक तर हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने या दोन्ही शिवसेना उमेदवारांनी विजय मिळवला. त्यामुळे बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाल्याने उद्धव ठाकरे अंबाबाईच्या दर्शनाला जात आहेत.

आज बाळासाहेब हवे होते : चंद्रकांत पाटील

दरम्यान, कोल्हापुरात शिवसेनेचा भगवा फडकवणं हे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निकालादिवशी म्हणजेच 23 मे रोजी समाधान व्यक्त केलं होतं. शिवाय आज बाळासाहेब असायला हवे होते, असंही ते म्हणाले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले आणि कोल्हापूर हे दोन मतदारसंघ आहेत. हातकणंगलेमधून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी स्वाभिमानीच्या राजू शेट्टींचा पराभव केलाय. तर कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांवर शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी मात केली. या विजयानंतर कोल्हापुरात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.

संबंधित बातम्या 

कोल्हापुरात भगवा फडकला, बाळासाहेब असायला हवे होते : चंद्रकांत पाटील   

 युतीची शोकांतिका! बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही ठेकेदार मिळेना    

Kolhapur Lok sabha result 2019 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निकाल  

उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडावी लागली, राणेंचा आत्मचरित्रात खुलासा 

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष