AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: आठवलेंचाच पक्ष भाजपच्या दावणीला, ते काय शिवसेनेवर बोलतील?; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला आहे. ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील, अशी खरमरीत टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आठवलेंवर केली आहे.

VIDEO: आठवलेंचाच पक्ष भाजपच्या दावणीला, ते काय शिवसेनेवर बोलतील?; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल
आठवलेंचाच पक्ष भाजपच्या दावणीला, ते काय शिवसेनेवर बोलतील?; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 8:38 AM

जळगाव: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांचाच पक्ष भाजपच्या (bjp) दावणीला बांधलेला आहे. ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील, अशी खरमरीत टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी आठवलेंवर केली आहे. आठवले म्हणजे भाजपचे कुणी निर्णायक नेते नाहीत. त्यांनी बोलण्याआधी भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांची परवानगी घ्यावी. त्यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. आठवलेंसारख्या नेत्यांना असं बोलणं शोभत नाही, असंही पाटील म्हणाले. रामदास आठवले यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेनेचे तीन चार खासदारही निवडून येणार नाही. शिवसेनेची परिस्थिती काँग्रेससारखी झाली आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली होती. गुलाबराव पाटील जळगावमध्ये मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मीडियाच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी जळगावच्या तेजस मोरेचे नाव घेतल्याने याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यावर बोलणे उचित होणार नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याबाबत विधानसभेत सोमवारी खुलासा करणार आहेत. त्यानंतर याप्रकरणातील नेमके सत्य काय ते बाहेर येईल. म्हणजेच दूध का दूध पानी का पानी होईलच, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात यश मिळेल असं नाही

देशातल्या चार राज्यांत भाजपला निवडणुकीत मोठे यश मिळालं आहे. यामुळे नक्कीच त्यांची स्फूर्ती वाढली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील निवडणुकीत ते बहुमत मिळवतील असा होत नाही. महाराष्ट्रातील निवडणुकांना दोन ते अडीच वर्षांचा काळ आहे. राजकारणात रोज बदल होत असतो. त्यामुळे देशातील निवडणुकांमध्ये यश मिळालं तर भाजपला महाराष्ट्रातही यश मिळेल असं होत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

राज्यात नोटीस देण्याची पद्धत नव्हती, जबाबदार व्यक्तीने बोलताना भान बाळगावं; अजितदादांचा सल्ला

राज्यात 5 हजार 142 गावांमध्ये राबवणार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना; कसा होणार शिवाराचा कायापालट?

डोंबिवली जवळील उंबार्ली टेकडीला वणवा, अग्निशमन विभागासह ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात

जर पूल धोकायदायक होता तर... कुंडमळा दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
जर पूल धोकायदायक होता तर... कुंडमळा दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा संताप.
लखनऊ विमानतळावर काय घडलं? विमानाच्या चाकातून ठिणग्या, धूर.. बघा VIDEO
लखनऊ विमानतळावर काय घडलं? विमानाच्या चाकातून ठिणग्या, धूर.. बघा VIDEO.
मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्... बघा VIDEO
मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्... बघा VIDEO.
विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला...
विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला....
शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन पवारांसमोर मोठा पेच?
शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन पवारांसमोर मोठा पेच?.
DCM असलेले अजित दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात
DCM असलेले अजित दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात.
मुंबईत रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? IMD चा अलर्ट काय?
मुंबईत रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? IMD चा अलर्ट काय?.
5 मिनिटं पूल हलला अन् लोकं सावध ... बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार
5 मिनिटं पूल हलला अन् लोकं सावध ... बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?.
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO.