AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena : एक पोस्ट, हकालपट्टी, फोनाफोनी, पुन्हा हकालपट्टी, पुन्हा फोन आणि भेट; आढळरावांनी सांगितली इन्साईड स्टोरी

शिवसेना पक्षातील समिकरणे ही काही एका रात्रीतून घडलेली नाहीत. आता आमदारांनी घेतलेल्या भूमिकेला महिना होत आहे. पक्षातील काही आमदारांनी मोठा उठाव केला. एवढेच नाही तर शाखा प्रमुखांपासून सर्व यंत्रणा हालली. या दरम्यानच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या धोरणामध्ये बदल करणे अपेक्षित होते. मात्र, हा बदल त्यांना मान्य नसल्याने इतरांनाही गप्प रहावे लागत आहे

Shiv Sena : एक पोस्ट, हकालपट्टी, फोनाफोनी, पुन्हा हकालपट्टी, पुन्हा फोन आणि भेट; आढळरावांनी सांगितली इन्साईड स्टोरी
शिवाजीराव आढळराव पाटील
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 19, 2022 | 1:16 PM
Share

मुंबई : आमदार, खासदारांपाठोपाठ आता (Shiv Sena) शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनीही पक्षाला जय महाराष्ट्र करण्यास सुरवात केली आहे. ज्येष्ठ नेते (Shivaji Bajirao Patil) शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई केल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याबाबत पक्षाने काय-काय भूमिका घेतली आणि नेमके एका पोस्टमुळे काय झाले याची इन्साईड स्टोरी सांगितली आहे. दरम्यानच्या तीन दिवसांतील घडामोडी त्यांनी मांडल्या आहेत. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाल्यानंतर कर्तव्य म्हणून अभिनंदनाची पोस्ट टाकली आणि त्यावरुन सुरु झालेले मतभेद हे थेट कारवाईपर्यंत येऊन पोहचले आहेत. मात्र, आमदार, पदाधिकारी, खासदार हे पक्ष का सोडून जात आहेत याच्या बाबतीत विचार न एकनिष्ठ असणाऱ्यांचीच हकालपट्टी शिवसेनेमध्ये सुरु झाल्याची खंत यावेळी पाटलांनी व्यक्त केली आहे.

‘त्या’ तीन दिवसांमध्ये नेमके काय झाले?

राज्यातील राजकीय उलथापालथी नंतर मुख्यमंत्री पदाची सूत्रे ही एकनाथ शिंदे यांच्या हाती आली आणि तेव्हापासून आढळराव पाटलांवर कारवाईला सुरवात झाली. त्याला कारणही तसेच आहे. पाटील यांनी सांगितले की, राज्यात नवीन मुख्यमंत्र्याची नेमणूक झाली. कर्तव्य म्हणून अभिनंदन केलं. पक्षाला आवडलं नाही. तीन दिवसात माझी हकालपट्टी केली. गेल्या 15 वर्षापासून काही नसताना मी या जिल्ह्यात काम केलं. तुम्ही एका पोस्टमुळे माझी हकालपट्टी करताय… मला बोलायचं तरी. विचारायचं तरी. मी साहेबांना फोन केला. तालुक्यातील लोक माझ्याकडे येणार होते. मी येणार होतो. पण वेळ नाही. ते म्हणाले, तुम्ही पोस्ट टाकली मला वाईट वाटलं. मी म्हणालो, मला त्यात चुकीचं काही वाटलं नाही. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणं मला चुकीचं वाटत नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी, विनायक राऊत आणि अनिल परब यांचा फोन आला. चुकीने झालं सांगितलं. मी काय एवढा छोटा माणूस आहे का चुकीने व्हायला. असे असतानाही झालेल्या चर्चेत आपण राष्ट्रवादी सोबत नको. आपण स्वबळावर उभं राहू. असे असतानाही राष्ट्रवादीला सोडून चालणार नसल्याची त्यांची भावना होती. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले आहे.

धोरणात बदल गरजेचा होता

शिवसेना पक्षातील समिकरणे ही काही एका रात्रीतून घडलेली नाहीत. आता आमदारांनी घेतलेल्या भूमिकेला महिना होत आहे. पक्षातील काही आमदारांनी मोठा उठाव केला. एवढेच नाही तर शाखा प्रमुखांपासून सर्व यंत्रणा हालली. या दरम्यानच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या धोरणामध्ये बदल करणे अपेक्षित होते. मात्र, हा बदल त्यांना मान्य नसल्याने इतरांनाही गप्प रहावे लागत आहे. 40 आमदार हा पक्ष सोडत असल्यावर यामागे नेमकी खदखद काय याचा अभ्यास होणेही गरजेचे असल्याचे मत शिवाजी अढळराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

नेमकी कारवाई कशामुळे?

शिवसेनेमध्ये पक्षप्रमुखांच्या आदेशाला किंमत असते. पक्षातील 40 आमदारांनी उठावाची भूमिका घेतल्यानंतर का होईना अपेक्षित बदल गरजेचा होता. मात्र, तो बदल नेतृत्वाला मान्य नसल्याने आम्ही गप्प राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाटलांनी सांगितले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर केलेल्या अभिनंदन पोस्टवरुन हा टोकाचा निर्णय घेतला गेल्याचेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

Follow Us
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती