AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजस्वी यादव यांनी वातावरण निर्माण केलंय, बिहारमध्ये परिवर्तन होणारच : चंद्रकांत खैरे

तेजस्वी यादव यांनी एका वेगळ्या वातावरण निर्माण केलंय. त्यामुळे बिहारमध्ये परिवर्तन होणं अटळ आहे, असं मत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलंय.

तेजस्वी यादव यांनी वातावरण निर्माण केलंय, बिहारमध्ये परिवर्तन होणारच : चंद्रकांत खैरे
| Updated on: Nov 02, 2020 | 11:21 PM
Share

पाटणा :  आरजेडी (RJD) नेते तेजस्वी यादव (tejashwi Yadav) यांनी बिहार विधानसभा Bihar Election) निवडणुकीचं वातावरण बदलून टाकलंय. बिहारच्या जनतेला बदल हवाय, हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे बिहारमध्ये नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल, असा विश्वास शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांंनी व्यक्त केला. (Shivsena Chandrakant Khaire on Bihar Vidhansabha Election)

चंद्रकांत खैरे आज विधानसभा निवडणूक प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी करत जेडीयू आणि भाजपला टोले लगावले. बिहारमध्ये एनडीएची अवस्था अतिशय वाईट झाली असून लवकरच जेडीयूदेखील एनडीएतून बाहेर पडेल, असा दावा त्यांनी केला.

“बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जितके नेते आले त्यांना कोरोना झाला. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. पण भीती वाटत असली तरी लोकांनी हक्काने मतदान करून परिवर्तन आणायचे ठरवले आहे”, असं खैरे म्हणाले.

“भाजपने महाराष्ट्रात जसं शिवसेनेला डावललं त्याचप्रमाणे बिहारमध्ये आता नितीश कुमार यांना डावलले जात आहे. तुम्हीच मुख्यमंत्रिपदी असाल असं नितीश कुमार यांना भाजपने सांगितलं तर दुसरीकडे चिराग पासवान यांना JDU च्या विरोधात उमेदवार उभे करण्यास सांगितलं. त्यामुळे आता नितीशकुमार गडबडले आहेत. ते लवकरच एनडीएतून बाहेर पडतील”, असा दावा खैरे यांनी केला.

“मला नितीश कुमार यांना विचारायचंय की तरुणांच्या रोजगाराच्या आश्वासन आपण दिले होते, त्याचं काय झालं?,  कोरोना काळात स्थलांतरित कामगारांसाठी आपण आणि आपल्या सरकारने काय उपाययोजना केल्या ? असे सवाल करत आपण फक्त घोषणा केल्या बाकी काही नाही”, अशी टीका खैरे यांनी केली.

“कोरोना असताना भाजपला आणि जेडीयूला निवडणुकांची एवढी घाई का झाली? महाराष्ट्रात सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या असताना इथे निवडणुका पुढे का ढकलल्या नाहीत?”, असा सवाल खैरेंनी उपस्थित केला.

“बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जितके नेते आले त्यांना कोरोना झाला, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस बिहारला आले आणि महाराष्ट्रात कोरोना घेऊन गेले”, असा टोला खैरेंनी लगावला.

महाराष्ट्रात ज्या प्रमाणे महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्याचप्रमाणे बिहारमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, असं भाकितही खैरे यांनी वर्तवलं. आज जामीन मिळूनही लालू जेलमध्ये आहेत, हे लोकांना पटत नाहीये, लोकांची सहानुभूती त्यांना मिळत आहे. लालूंच्या मुलाने नवं वातावरण तयार केलं आहे, असं ते म्हणाले.

“भाजपच्या मोफत लसीच्या घोषणेसाठी निवडणूक आयोगाने कारवाई करायला हवी. निवडणूक म्हणून फक्त बिहारला लस मग सगळयांना लस का नाही? केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करत नाही, पण इथे लस मोफत, यातूनच सरकारचं वर्तन आपल्याला दिसून येतं. पंतप्रधान मोदींची भाषणे हवी तशी होत नाहीत”, असा टोलाही त्यांनी सरतेशेवटी लगावला.

(Shivsena Chandrakant Khaire on Bihar Vidhansabha Election)

संबंधित बातम्या

लोकांना नितीश कुमार नको, बिहारचे पुढचे मुख्यमंत्री तेजस्वी यादवच : संजय निरुपम

बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची : संजय राऊत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.