AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जामिनावरील गायक दलेर मेहंदीचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत दलेर मेहंदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी पंजाबी गायक हंसराज हंसनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपने उत्तर पश्चिम दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सेलिब्रिटींची आवक […]

जामिनावरील गायक दलेर मेहंदीचा भाजपमध्ये प्रवेश
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM
Share

नवी दिल्ली : पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत दलेर मेहंदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी पंजाबी गायक हंसराज हंसनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपने उत्तर पश्चिम दिल्लीतून उमेदवारी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सेलिब्रिटींची आवक वाढल्याचं या निमित्ताने दिसून येत आहे. कारण दलेर मेहंदी, हंसराज हंस, अभिनेता सनी देओल, क्रिकेटर गौतम गंभीर यासारखे सेलिब्रिटींनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

कोण आहे दलेर मेहंदी?

दलेर मेहंदी हे पंजाबी गायक आहेत. त्यांचा जन्म बिहारच्या पाटणा इथं 18 ऑगस्ट 1967 रोजी झाला.

दलेर मेहंदी यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच गायनाला सुरुवात केली.

1995 मध्ये दलेर मेहंदी यांनी गाण्याचा पहिला अल्बम रेकॉर्ड केला. ‘बोलो ता रा रा रा’ या अल्बमला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

1998 मध्ये दलेर मेहंदींचा आणखी एक अल्बम आला. ‘तुनक तुनक तून’ हा अल्बमही प्रचंड गाजला.

मानव तस्करीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा

दलेर मेहंदी आणि त्यांचा भाऊ शमशेर सिंह यांना मानव तस्करी (कबुरबाजी) प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याप्रकरणी दलेर मेहंदी दोषी ठरला. त्याला अटक करण्यात आली होती. सध्या दलेर मेहंदी जामीनावर बाहेर आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.